2 जुलाई 2011

‘मराठवाडा’ बुडविल्याचे पाप लोकमत ने धुतले...!

आज सकाळी सकाळी आमचे मन प्रसन्न झाले. लोकमतने आपले जुने पाप आज धुवून टाकले. साधारण दोन दशकांपूर्वी मराठवाड्यात ‘मराठवाडा’ हे दैनिक छान चालत असे. कै. अनंतराव भालेराव यांच्या नेतृत्रावाखाली चालणारे हे वृत्तपत्र स्वातंत्र्यलढ्यापासून चालू होते. बाबूजींचे पत्र औरंगाबादेत आले आणि अव्यावहारिक मराठवाडा रसातळाला गेला. यांनी तिथली माणसे पळविली. बऱ्याच गमती-जमती केल्या आणि अखेर त्या दैनिकाचा श्वास थांबला.
कै. अनंतराव भालेराव हे या दैनिकाचे सर्वेसर्वा. ज्यांच्या लेखणीच्या दमावर वृत्तपत्र चालायचे असे खूप कमी पत्रकार झाले. आचार्य अत्रे, ग. वा. बेहेरे, अनंतराव भालेराव, विवेक घळसासी... अशी छोटीशी यादी तयार होते. अशा अनंतराव भालेराव यांचे समग्र लेखन २ खंडात आज प्रकाशित होते आहे.

अनंतराव हे मराठवाड्यातील पत्रकारितेतील पितामह. त्यांच्या या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने लोकमत ने आज पहिल्या पानावर ३ कोलम बातमी छापली आहे. एवढेच नवे, तर आतील पानावर व्यंकटेश केसरी यांचा अर्धे पान लेखही चपला आहे. हे सारे गोड धक्का देणारे आहे. पण एक विचार मनात येतो – हे पापक्षालन तर नव्हे? काहीही असो, पहिल्या नंबरच्या पेपरने असे छापणे आनंददायी आहे. पण हा ‘डीएम’ इफेक्ट तर नव्हे? काहीही असो, एका महान पत्रकाराला एवढी प्रसिद्धी देत त्यांनी दिलेल्या मान वंदनेला आम्ही दाद देतो.
या उलट मराठवाड्यात आपल्या दिव्याच्या प्रकाशाचा उजेड पडण्यासाठी आलेल्या पत्राने या वृत्ताला एका कोपऱ्यातली जागा दिली आहे. अनंतराव भालेराव यांना न ओळखणारी पिढी या पत्रात नोकरी करते आहे, असे दिसते. खरे तर पत्रकारितेतील प्रत्येकाने जे ग्रंथ विकत घेउन पारायणे करून काही शिकावे, अशा योग्यतेचा हा पत्रकार. त्यांच्याकडे असे दुर्लक्ष्य! हरी हरी. तरी एक बरे, त्यांचा निवासी संपादक एके काळी मराठवाडा दैनिकात काम करीत होता म्हणे...!
मग दिव्याने या बातमीवर प्रकाश का टाकला नाही बरे? काय भोपाळसेठ? आपण तर पगार भरपूर दिले आहेत म्हणे? या विषयात कुणाची काही अपेक्षा होती का? असे चीन्धीचोर आपल्याकडे आहेत का? तपास करा.










आणि, ही आहे दिव्याच्या प्रकाशातील इवलीशी बातमी.


अनंतराव हे मराठवाड्यातील पत्रकारितेतील पितामह. त्यांच्या या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने लोकमत ने आज पहिल्या पानावर ३ कोलम बातमी छापली आहे. एवढेच नवे, तर आतील पानावर व्यंकटेश केसरी यांचा अर्धे पान लेखही छापला आहे. हे सारे गोड धक्का देणारे आहे. पण एक विचार मनात येतो – हे पापक्षालन तर नव्हे? काहीही असो, पहिल्या नंबरच्या पेपरने असे छापणे आनंददायी आहे. पण हा ‘डीएम’ इफेक्ट तर नव्हे? काहीही असो, एका महान पत्रकाराला एवढी प्रसिद्धी देत त्यांनी दिलेल्या मान वंदनेला आम्ही दाद देतो.
या उलट मराठवाड्यात आपल्या दिव्याच्या प्रकाशाचा उजेड पडण्यासाठी आलेल्या पत्राने या वृत्ताला एका कोपऱ्यातली जागा दिली आहे. अनंतराव भालेराव यांना न ओळखणारी पिढी या पत्रात नोकरी करते आहे, असे दिसते. खरे तर पत्रकारितेतील प्रत्येकाने जे ग्रंथ विकत घेउन पारायणे करून काही शिकावे, अशा योग्यतेचा हा पत्रकार. त्यांच्याकडे असे दुर्लक्ष्य! हरी हरी. तरी एक बरे, त्यांचा निवासी संपादक एके काळी मराठवाडा दैनिकात काम करीत होता म्हणे...!
मग दिव्याने या बातमीवर प्रकाश का टाकला नाही बरे? काय भोपाळसेठ? आपण तर पगार भरपूर दिले आहेत म्हणे? या विषयात कुणाची काही अपेक्षा होती का? असे चीन्धीचोर आपल्याकडे आहेत का? तपास करा.