14 जुलाई 2011

आता सकाळ च्या वाचकांनाच भरली हुडहुडी...!

सकाळ मध्ये सध्या धमाल चालू आहे. मागे ३ जुलै रोजी 'आम्हाला वगळा...' हा अनंतराव भालेराव यांचा लेख जशाला तसा सकाळ च्या मुख्य अंकात आणि औरंगाबाद टुडे मध्ये दोन वेळा छापला गेला. आज पोस्ट खात्याची एक बातमी औरंगाबाद टुडेच्या पान ३ आणि पान ८ वर जशीच्या तशी छापून आली आहे. एकाच किमतीत दोन अंक न देता एकाच बातमी दोन वेळा छापण्याच्या या पत्रकारितेला काय म्हणायचे? पवार साहेब, नुसते बस थांबे रंगवून अंक विक्री वाढत नसते. अंक चांगला काढावा लागतो, मग लोक आपोआप विकत घेतात. मग १ रुपयात अंक देण्याची सुद्धा गरज उरत नाही...!