30 सितंबर 2011

भोपाळसेठ, How do you do?


आदरणीय भोपाळसेठ यांना,


जय अग्रसेन,

महाराष्ट्रातील समस्त वाचकवर्गांतर्फे साष्टांग प्रणिपात. आम्ही मराठी माणसे काही ‘भव्य-दिव्य’ असेल तरच साश्तांग प्रणिपाताच्या भानगडीत पडतो. अन्यथा साध्या नमस्कारावर भागवतो. ज्या अर्थी आम्ही आपणास साष्टांग प्रणिपात करीत आहोत, त्या अर्थी त्याचे कारणही काही ‘भव्य-दिव्यच’ असणार, हे नक्की. वास्तविक आपल्या प्रॉडक्टच्या नावातच ‘दिव्य’ असल्यामुळे सर्वांनी आपल्या चरणी पर्मनंट साष्टांग दंडवत घालत आले पाहिजे अशी आपली अपेक्षा असणे साहजिकच आहे. म्हणोनच आम्ही आमचा साष्टांग प्रणिपात आपले चरणी रुजू करतो.

तर पत्रास कारण की सध्या आपल्या ‘प्रॉडक्ट’चे अश्व चौखूर उधळताना दिसत आहेत. फक्त चौखूर उधळताना एका वेळी किमानपक्षी दोन खूर तरी जमिनीवर टेकावेत अशी अपेक्षा असते. चारही खूर हवेत असतील आणि मांड पक्की नसेल तर तोंडघशी आपटावे लागते. तसेच घडताना सध्या दिसत आहे. मलिक अंबरच्या नगरीतील आमच्या एका जबाबदार वाचकाने पाठविलेले निवेदन आम्ही नुकतेच प्रकाशित केले होते. (आमचे बंधू बेरक्या यांनाही त्यांनी ते पत्र पाठविलेले दिसले. कारण तेथेही ते प्रकाशित झाले. एकच लेख दोन ठिकाणी छापण्यास आम्ही हरकत घेत नाही, कारण आमचा वसा लोकशिक्षणाचा आहे.) तर सांगण्यास हरकत नाही की आपल्या संशोधकांनी मोठ्या संशोधनांति प्रकाशित केलेल्या मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या कॉफीटेबल बुकमधून आपल्या दैनिकालाच मुक्ती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकाच पुस्तकात किती घोटाळे असावेत? कोण आहेत याचे कर्ते-करविते?

महाराष्ट्रातील सर्वात जास्त पगाराची नोकरमंडळी आपण नेमली आहे. हा पगार नेमका कशासाठी देता बरे? बरे, माणसे नेमतानाही आपण अशी अशी माणसं नेमली की ज्याचे नाव ते...! कुमारस्वामींबद्दल तर आम्ही खूप आधी आपणास सावध केले होते. ‘सटवाईला मिळाला म्हसोबा’ अशी जगप्रसिद्ध कॉमेंटही आम्ही त्यावर केली. हे कुमारस्वामी काय करतात बरे? त्यांनी ही प्रुफे पाहिली नव्हती का? की ते प्रुफे पाहत नसतात? असो, हा तुमचा परस्पर व्यवहार आहे. आम्ही त्यात कशास पडावे?

आपले ‘सल्लागार’ काय करतात? की ते तुमचे पोटभाडेकरू आहेत? ते आर्थिक क्रांतीत मग्न असतात. तिकडे जीव असलेला माणूस इकडे तुमचा सल्लागार! छान आहे. तुमचा पगार खाऊन तुमच्याचकडे ते दर रविवारी आर्थिक क्रांतीचे धडे देतात! खरे सांगायचे तर ते आर्थिक क्रांतीच्या क्षेत्रातील आद्य क्रांतीकारक आहेत. एकेकाळी मलिकअंबरच्या नगरीत सकाळीच प्रकाशित होणार्‍या एका नियतकालिकाचे प्रमुखपद त्यांच्याकडे असताना त्यांनी अशा अनेक आर्थिक क्रांत्या तेथे घडविल्या. त्या जोरावर त्यांनी पुण्यनगरीत एक फ्लॅट असताना मलिकअंबरनगरीत बंगला बांधला आणि पुण्यनगरीत आणखी एक फ्लॅट बुक केला! आपल्या आगमनापूर्वी पत्रकारितेतील पगार होतेच किती? एवढ्या पगारात इतकी घोडदौड? कमाल है! ही खरी आर्थिक क्रांती. यात किती रिपोर्टरांचे योगदान आहे, हा संशोधनाचा विषय!

तर, अशा या सल्लागाराची मदत या पुस्तकासाठी आपण का नाही घेतली बरे? पण घेतली असती तरी काय झाले असते? हे मुळातच घोटाळेबाज! परवा अमेरिकेवरील हल्ल्याची दशकपूर्ती साजरी झाली. या निमित्ताने आम्हास काही गोष्टी आठवल्या. त्या बाबत इंटरनेटवर बरेच काही काही समोर येत असते. तशातच शेजारचा फोटो समोर आला. ते पाहून आमच्या पूर्वस्मृती जागल्या. या सद्गृहस्थांनी त्या काळी हा फोटो पहिल्या पानावर छापून ‘WTCवरील हल्ल्याआधीचा दुर्मीळ फोटो’ असे वर्णन केले होते. वास्तविक हा फोटो म्हणजे मोठाची विनोद होता. अखेर त्या दैनिकाची राज्यभर पुरती नाचक्की झाली आणि दुसर्‍या दिवशी त्यांना राज्यभरातून छी-थू सहन करावी लागली. वर माफीही मागावी लागली. हा वारसा असणारी माणसे आपणास काय मदत करणार?

याशिवाय आपण नेमलेले वेगवेगळे ‘हेड’ काय करतात? एकदा खराखुरा हेडकाउंट कराच. खरे हेड किती हे कळल्यानंतर आपले हेड नक्कीच जागेवर राहणार नाही? बघा, काहीतरी चांगले करा. आपण एवढ्या दूरवरून आला आहात. जरा जवळून निरीक्षणाची सवय लावून घ्या. फायद्यात राहाल.

जय भोपाळ.

19 सितंबर 2011

दिव्य मराठीने पाजळले अकलेचे दिवे, ‘मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे मार्केटिंग हवे’


औरंगाबाद येथील एका वाचकाने पाठवलेला हा लेख जशास तसा देत आहोत.
- बोरुबहाद्दर

दैनिक दिव्य मराठीने 17 सप्टेंबरच्या मुहुर्तावर ‘हैदराबाद मुक्तीलढा आणि मराठवाडा’ या नावाने एक कॉफीबुक (टपरीवर काचेच्या गिल्लासात कट चहा पिणार्‍या आम्हा मराठवाड्यातील जन्तेला कॉफी कशी माहिती असणार? कॉफीबुक म्हणजे काय ते कसे कळणार?) प्रकाशित केले. मराठवाडी जनतेच्या भावनांना हा विषय नेहेमीच हात घालणारा आहे. मराठवाडी अस्मितेला चुचकारताना मात्र ‘दिव्य मराठीकारांनी’ ज्या असंख्य चुका करून ठेवल्या आहेत, त्या पाहता ‘दिव्य मराठी’चे मार्केटिंग करताना त्यांनी काहीच तारतम्य बाळगलेले नाही, असेच स्पष्ट होते आहे.


1) या ‘कॉफीटेबल बुक’च्या मुखपृष्ठावरील शीर्षकापासूनच चुकांना सुरवात झाली आहे. ‘हैदर अलीने आबाद केलेले ते हैदराबाद’ असा संदर्भ असताना इथे तो शब्द चक्क ‘हैद्राबाद’ असाच आला आहे. हे ‘हैद्रा’ कोण? ही चूक आतील पानांवर मात्र दुरूस्त झालेली दिसते!

2) ‘स्टेट एडिटर’ हे पद भूषविणारे श्री. अभिलाष खांडेकर यांना भारताचा नकाशा वाचता येत नसावा. त्यांनी या पुस्तकाच्या प्रारंभी लिहिलेल्या प्रस्तावनेत हैदराबाद संस्थानाचा ‘देशातील हा असा एक कोपरा होता, जो निजामाच्या जोखडातच राहिला’ असा उल्लेख केला आहे. कोणत्या अर्थाने हैदराबाद संस्थान ‘कोपरा’ ठरते?

3) ‘आपण खेकड्याची वृत्ती स्वीकारल्याने मुक्तीलढ्याचे स्मारक अद्याप होऊ शकले नाही, हे एक कारण हे पुस्तक लिहिण्यामागे आहे’ (‘कॉफीटेबल बुक’ - प्रकरण पहिले - पृष्ठ 13) असे एक वाक्य यात आहे. यामधील ‘आपण’ म्हणजे कोण? मराठवाड्यातील जनता हे पुस्तक लिहिते आहे का?

4) ‘पर्यटनाचे वा पेंग्विन नॅशनल जिऑग्राफीचे आकर्षक प्रत्येक पान ग्लॉसी. सुंदर छायाचित्रांसह असावे, जेणेकरून लोक कुतुहलापोटी पाहतील, त्याची जास्त जाहिरात होईल. तरुण पिढी, परप्रांतीय व मराठवाड्याबाहेरील लोकही हे पुस्तक चाळतील ही देखील एक कल्पना. अगदीच व्यावसायिक भाषेत बोलायचे झाले तर ‘मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे मार्केटिंग वा ब्रँडिंग होईल.’ इथे ‘दिव्य मराठी’ नेमके कशाचे मार्केटिंग करू पाहत आहे? मुक्तीसंग्रामाचे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मार्केटिंग आणि ब्रँडिंग केले तर नेमके कोणाचे आणि काय भले होणार आहे? अण्णा हजारेंच्या आंदोलनात कुठलेही मार्केटिंग व ब्रँडिंग नसताना उत्स्फुर्तपणे लाखोंच्या संख्येने सहभागी होणारी तरुण पिढी ‘दिव्य मराठी’च्या मार्केटिंगमुळे हैदराबाद मुक्तीसंग्रामाकडे आस्थेने बघेल, असे त्यांना वाटते! जणू हे दैनिक नसल्याने आजवर मुक्तीलढ्याची काहीच माहिती जनतेला झाली नव्हती!

5) या ‘कॉफीटेबल बुक’च्या पृष्ठ क्रमांक 14 वर ‘का हा अन्याय? याचं कारण एकच की याचं मार्केटिंग स्टेट, राष्ट्रीय पातळीवर प्रभावीपणे कधी झालंच नाही. ते व्हावे म्हणून हा प्रपंच.’ ... ‘माझ्या मते मुक्तीलढ्याला प्रसिद्ध तंत्र नसल्याने या लढ्याबद्दल अधिक माहिती पुढे यावी’ या वाक्यांचा अर्थ काय? पहिले संपूर्ण प्रकरण अशा अनेक विसंगत व अप्रस्तुत विधानांनी भरलेले आहे. 

6)  या ‘कॉफीटेबल बुक’च्या पृष्ठ क्र. 15 वर ‘गोविंदभाई श्रॉफ यांनी सोशालिस्ट (समाजवादी पक्ष) पार्टी काढली.’ असा उल्लेख आहे. खरं तर गोविंदभाईंनी काढलेल्या पक्षाचे नाव ‘लीग ऑफ सोशालिस्ट वर्कर्स’ असे आहे. याच पानावर पुढे असे म्हटले आहे, की ‘स्वातंत्र्यसैनिकांचे सत्तेतील व सत्तेबाहेरील असे समाजवादी विरुद्ध कॉंग्रेस असे गट पडले. त्यांनी एकमेकांकडे, त्यांच्या मुक्तीसंग्रामातील कामगिरीकडे दुर्लक्ष केले. मात्र, गोविंदभाई श्रॉफ हे टॉवरिंग पर्सनॅलिटी असल्यामुळे व नंतर ते शैक्षणिक क्षेत्रात कार्यर्‍त झाल्यामुळे नेहेमी चर्चेत व पुस्तकात राहिले. इतर मात्र तेवढे राहिले नाहीत.’ या वाक्यातून दिव्य मराठीच्या विद्वानांना आपले नेमके कुठले ज्ञान पाजळायचे आहे? सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत पार आधीपासून गोविंदभाई सक्रीय होते. आणि दिव्य मराठी 
मात्र ते नंतर कार्यरत झाल्याचे सांगते!

7) या ‘कॉफीटेबल बुक’च्या दुसर्‍या प्रकरणातील दुसर्‍याच ओळीत ‘14 जिल्ह्यांचे मिळून हैदराबाद संस्थान झाले’ म्हटले आहे. यापुढे ‘नकाशात पाहा’ असा उल्लेख आहे. प्रत्यक्षात नकाशात पाहिल्यानंतर तेथे मात्र 15 जिल्हे नोंदविलेले दिसतात. नकाशातील एकूण जिल्हे तीन पाने मागे आल्यानंतर 1 ने कमी होतात, ही जादू कुठल्या स्टॅटिस्टिक्सचे द्योतक आहे? यापुढे या दैनिकाने उपसंपादक, प्रुफरीडर, आर्टिस्ट यांच्याबरोबरच एक ‘स्टॅटेस्टिशियन’ही नेमायचा का?

8) या एकंदर 122 पानी पुस्तकात अक्षरशः पानोपानी चुका आहेत. केवळ वानगीदाखल वरील उल्लेख केलेले आहेत. स्वामी रामानंद तीर्थ यांचे या लढ्यावरील मूळ पुस्तक ‘हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या आठवणी’ याचा कुठेही उल्लेख सापडत नाही. अखेरच्या पानावर दिलेल्या संदर्भ ग्रंथांच्या यादीतही. या लढ्याच्या सेनापतीने लिहिलेल्या पुस्तकाचीही दखल दिव्य मराठीला घ्यावीशी वाटली नाही. बहुधा स्वामीजींचे ‘मार्केटिंग व ब्रँडिंग’ कमी पडले असावे!

9) हे संपूर्ण पुस्तक मराठीत लिहिले गेले आहे. (यातील काही इंग्रजी शब्दही - उदा. : ‘शो’, ‘टॉवरिंग पर्सनॅलिटी’, ‘ग्लॉसी’, ‘मार्केटिंग व ब्रँडिंग’, ‘ऑप्शनला’, ‘पोलिस ऍक्शन’ इ. - देवनागरी लिपीतच लिहिले गेल्याने या पुस्तकाला मराठीतील पुस्तकाचा दर्जा देण्यास हरकत नाही. पण सहाव्या पानावर ‘प्रोजेक्ट टीम’ अशा इंग्रजी शीर्षकाखाली ‘प्रोजेक्ट कोआर्डिनेटर - वृषाली घाटणेकर, रिसर्च - डॉ. महेश सरवदे, एडिटोरियल टीम - रमेश धाबे, प्रवीण देशपांडे, रोहन पावडे, शरद काटकर, बाबासाहेब डोंगरे, सय्यद नजाकत, दिनेश लिंबेकर, फोटोग्राफी - किशोर निकम, माजीद खान आणि डिझाईन व छपाईवाला अशी सर्व नावे शुद्ध इंग्रजीतून दिली आहेत. हे का म्हणून बरे? पान 5 वर या वृत्तपत्रसमूहाचे अध्यक्ष अग्रवालसेठ स्वतः आपले मनोगत ‘लढवय्यांबद्दल कृतज्ञता’ मराठीत व्यक्त करतात. पण इतरांना इंग्रजीचा आधार का घ्यावासा वाटतो? अशामुळे हे पुस्तक - सॉरी कॉफीटेबल बुक - इंटरनॅशनल दर्जाचे होईल, असे वाटते का?

या ‘कॉफीटेबल बुक’ला ‘महात्मा गांधी मिशन’ या संस्थेने प्रायोजित केले आहे. यात काय व्यवहार झाला, याच्याशी आम्हाला काहीही देणेेघेणे नाही. पण जेव्हा या संस्थेचे सचिव अं. ना. कदम आपल्या छायाचित्रासह या ‘कॉफीटेबल बुक’च्या सातव्या पृष्ठावर ‘स्मरण हुतात्म्यांचे’ व्यक्त करतात, तेव्हा या पुस्तकात काय छापून येते आहे या विषयीही त्यांनी तज्ज्ञांकरवी खातरजमा करून घ्यावयास हवी होती. दान सत्पात्री पडावे, असे थोरामोठ्यांनीच सांगून ठेवले आहे...!

- एक जागरूक वाचक

बेरक्या वाचू नका, त्यामुळे तुमचे काम बिघडत आहे! खांडेकर व लांबेचा डीएममध्ये आदेश


(बेरक्यावरून)

औरंगाबाद- दिव्य मराठीमध्ये फक्त लांजेवार आणि श्रीकांत सराफ दादागिरी करतात असे नाही. तर खांडेकर आणि लांबे  ही हाच पाढा गिरवत आहेत. सतत बातम्या महत्वाच्या  बातम्या  मिस होत असल्याने आणि बाहेरच्या बातम्यांपेक्षा किशोर निकम आणि सामनातील  फोटोग्राफरच्या मारामारीच्या बातम्या जास्त येत असल्याने अखेर खांडेकर आणि लांबे या जोडगोळीने सगळा राग बेरक्यावर काढला आहे.
वाटले तर बातम्या करू नका, पण बेरक्या वाचत जाऊ नका, असा सल्ला खांडेकर आणि लांबे यांनी दिला आहे.  आम्ही तुमचे सिनिअर आहोत, याची आठवण जोडगोळीने करून दिली. आमची बदनामी झाली तर तुम्ही डगमगताल, म्हणून बेरक्या वाचू नका असे खांडेकर आणि लांबे यांनी मिटिंग घेवून सांगितले. 

आता तुम्हीच सांगा त्या निकमला मस्ती करायला काय आम्ही सांगितली होती . त्याने खोटे माणसे पाठवून सामनातील प्रेस फोटोग्राफरला भडकविले हि काय कोणाची चूक म्हणावी. नाचता येईना अंगण वाकडे असा हा प्रकार सुरु आहे. काही कार्यालायात आमच्यावर बंदी घातली होती. पण आता निकमसारखे मोजकेच लोक कार्यालायात इंटरनेट वाचतात. कर्मचार्यांना घरी बेरक्या वाचण्यापासून खांडेकर आणि लांबे कसे रोखणार. त्यांचाही दिवसच बेरक्या वाचनाने सुरु होतो, मग त्यांनीच हे का सांगितले?

ता. क.- आता सांगा बेरक्या वाचल्याने दिव्यचे कर्मचारी बिचकत आहेत यावर कोणाचा विश्वास बसेल का?

14 सितंबर 2011

क्षण एक पुरे ‘प्रेमा’चा... मजनू होतो प्रेम‘दासा’चा...

पेपरवाल्यांनी पेपर काढून विकण्याबरोबरच इतर अनेक उद्योग सुरू केल्याने वृत्तपत्रांच्या कचेरीमध्ये पत्रकारेतर कर्मचार्‍यांची बरीच भाऊगर्दी (आणि बहिणगर्दी) दिसू लागली आहे. एकेकाळी युवामंच असत. आता सख्यांचे मंच असतात. व्यापार्‍यांचे मंच असतात. उद्योगांचे मंच असतात. वाचक सोडून सगळ्यांचेच मंच असतात. (वाचक आपले ‘मुकी बिचारी कुणीही हाका’टाईप असतात. मध्येच ‘मर्जी’ जाणून घेण्याची उबळ काही जणांना येते. पुन्हा सारे काही शांत शांत)

तर अशाच एका मंचाच्या बहिणबाईंची ही कथा. सिद्धेश्र्वरनगरीत एक दैनिक राज्य करीत होते. (‘एक राजा राज्य करीत होता’च्या धर्तीवर ही कल्पना कशी वाटते?) या राज्यात प्रजाजन कमी पगारात भरपूर काम करीत होते. राज्यात सख्यांसाठी विशेष मंच होता. (सख्याहरींसाठीही असाच एक मंच असावा, अशी मागणी अनेकांनी केली होती पण हे प्रकरण आपल्याला आवरणार नाही, हे लक्षात घेऊन राजाने त्याला मनाईहुकुम बजावल्याचे कळते.) या सख्यांच्या मंचाचा गल्ला सांभाळणार्‍या बहिणबाईकडे अधूनमधून सख्यांना एकत्र करण्याचेही काम असते म्हणे. तर या बहिणबाईंनी आपल्या सर्व सख्यांचा समस्त तपशील आपल्या संगणकात बंदिस्त करुन ठेवला. हा तपशील आपल्याकडे बंदिस्त स्वरुपात असल्याचा त्यांचा समज एकदा खोटा ठरला आणि या राज्याच्या जाहिरातमंत्र्यांनी आपल्या संगणकावरून तो पळविला असल्याचे त्यांच्या म्हणे लक्षात आले.

ते जाहिरातमंत्री तर या सखीमंत्री. असे परस्पर चोर्‍या चपाट्या करून कसे चालणार? (अशा चोर्‍या करायला ही काय ‘मर्जी’ची थीम थोडीच आहे?) असो. तर या मंत्रीणबाईंनी त्या मंत्र्यांविरुद्ध राजांकडे तक्रार गुदरली. (गुदरली हा शब्द वापरताना आम्हाला नेहेमीच हसू फुटते) राजांनी तटस्थपणी दाखविण्यासाठी चौकशी सुरू केली. (अशी चौकशी सुरू करावीच लागते. म्हणजे तक्रार करणार्‍याचे समाधान होते आणि ज्याच्याविरुद्ध तक्रार असते त्याच्याववरही वचक बसतो! हे आपले स्वानुभवी तत्वज्ञान!)

अशा तक्रारींचे पुढे काय होते, हे सर्वांनाच माहिती असते. राजाला काय, कुठूनही आपला महसूल वाढण्याशी देणेघेणे असते. त्यामुळे या चोरीचा त्याला मनस्वी आनंदच झाला होता. पण नाटक करणे भाग असते. आपल्या अंमलाखालील विविध ठिकाणच्या इंजिनिअरना बोलावून एक समिती गठित करण्यात आली. या समितीने सिद्धेश्वरनगरीत जाऊन या दोन्ही मंत्र्यांच्या संगणकांची, त्यांच्यातील जोडांची आणि त्यातील साठ्याची बारकाईने पाहणी केली. आता खरी गंमत तर पुढेच आहे.

ही पाहणी मुदलात होती ती जाहिरातमंत्र्यांच्या चोरीसाठी. त्याचे काय काय झाले, ते कळले नाही. पण भलतीच गंमत तेथे घडल्याचे आमच्या कानावर आले. त्याचे झाले असे, की सखीमंत्री आणि बातमीमंत्री यांच्यात सख्यांच्या मंचावरून, राज्याच्या भरभराटीवरून बरीच सखोल चर्चा होत असे म्हणे. या चर्चेसाठी या बहिणबाई संबंधित बातमीमंत्र्यांच्या बंदिस्त कक्षात स्वतःला बराच वेळ बंदिस्त करून घेत असत म्हणे. या बांध-बंदिस्तीबरोबरच त्यांचा संगणकीय संवादही चालू असे म्हणे. नेमका हाच संवाद या तज्ज्ञ इंजिनइरांच्या हाती पडला आणि मग काय महाराजा... काय गंम्म्म्मत झाली म्हणून सांगू... मूळ तक्रार राहिली बाजूलाच...!

प्रेमाचा दास झाल्यावर पत्रकाराचा मजनू होतो आणि मग काय महाराजा, सखी तर अशा वेळी तयारच असते...

तात्पर्य काय? माणसांच्या बदल्या दूर दूर करू नये. कुटुंबापासून दूर राहिले की भावना अनावर होतात आणि दुधाची तहान पर्यायी दुधावर भागवावी लागते...!!!!

1 सितंबर 2011

खुषखबर... कुमारस्वामी आता ‘खा.’ होणार...!

खुष खबर... खुष खबर... खुष खबर... महाराष्ट्र देशीचे महान पत्रककार श्री श्री कुमारस्वामी यांच्या गळ्यात लवकरच ‘खा.’ पदाची माळ (अखेर) पडणार असल्याचे आमच्या खात्रीलायक सूत्राकडून (म्हणजे आमच्या मनातल्या मनात) कळते. 


श्री श्री कुमारस्वामी (श्री श्री ही दुहेरी उपाधी त्यांच्याबद्दल आमच्या मनातील परम आदर दर्शविणारी आहे. गैरसमज नसावा) म्हणजे निधड्या छातीचा पत्रकार! आतापर्यंत त्यांनी आपल्या स्वतःच्या छातीत कित्येक गोष्टी दाबून ठेवल्या. योग्य वेळी त्या त्यांनी बाहेर काढल्या. त्यांच्या अनेक इच्छा होत्या. महाराष्ट्रदेशीच्या सर्वाधिक दैनिकांच्या प्रमुखपदावर काम करून दाखवीन ही प्रतिज्ञा त्यांनी त्यांच्या लहानपणी त्यांच्या आईसमोर केली होती असे मध्यंतरी त्यांच्या मावशीकडून आम्हाला कळले. (या मावशींचा चिरोटे तयार करून विकण्याचा व्यवसाय आहे. पुण्यात आमच्या शेजारीच राहतात.) लहानपणी आपल्या आईला दिलेले वचन म्हातारपणापर्यंत जाताना (खरे तर आम्ही त्यांना म्हातारा म्हणू इच्छित नव्हतो. पण शब्दांचा परिणाम उठून दिसण्यासाठी हा शब्द वापरण्याचा नाईलाज आहे. क्षमस्व) स्मरणात ठेवण्याची त्यांची शक्ती खरोखरच स्पृहणीय आहे म्हणायची. आतापर्यंत इंग्रजी-मराठी धरून मुदलात पाच पेप्रांच्या मेन मेन पोस्टवर श्री श्री कुमारस्वामी यांनी आपली योग्यता सिद्ध केली. सध्या त्यांच्या ‘दिव्य’ बुद्धिमत्तेचा प्रकाश सार्‍या संबंध अख्ख्या अखिल महाराष्ट्रभर फाकतो आहे. 


अर्धा भारत व्यापणार्‍या गटाच्या, अर्धा महाराष्ट्र व्यापणार्‍या पत्राचे आता ते अध्वर्यू आहेत. (पण याला अर्धवट म्हणायचे नाही. सांगून ठेवतो.) त्यांच्या लोकविलक्षण प्रतिभाविलासाने अख्खा महाराष्ट्र मंत्रमुग्ध झाला आहे. त्यांच्या पेप्रात छापून आलेल्या असंख्य चुकांकडे तमाम वाचक इतक्या मोठ्या मनाने पाहतात की ज्याचे नाव ते. त्यांचे अग्रलेख म्हणजे साक्षात सरस्वतीचे तांडवनृत्य ! (अरेरे ... उपमा चुकली वाटते) 
तर श्री श्री कुमारस्वामी यांच्या ‘खा.’ पदाबद्दल आम्ही बोलत होतो. ज्या प्रमाणे त्यांनी आपल्या मातुःश्रींना सर्वाधिक पेप्रांच्या प्रमुखपदांवर काम करून दाखविण्याचे वचन दिले होते तद्वतच त्यांनी आपल्या (तत्कालीन) प्रेयसीस (प्रोबेशनवर असताना इंप्रेशन मारण्यासाठी) कधी ना कधी ‘खा.’ होऊन दाखवीन अशी बढाई मारली होती. ‘खा.’ झाल्यावरच आपण (आपल्या लग्नाचे) लाडू खाऊ असे तिने सांगितल्याने त्यांचा नाईलाज झाला. तो नाईलाज कायम राहिला. (एरव्हीही पत्रकारांना पोरी देण्यासाठी त्यांचे बाप नाराजच असत. दरिद्री पत्रकाराला पोरगी देण्यापेक्षा विहिरीत ढकललेली बरी, असे त्यांचे म्हणणे असते. त्यामुळे आमचीही खूप अडचण झाली होती. आता बरे आहे.) तर सांगायचा मुद्दा हा, की आताही ती त्यांना (आपल्या पती व मुलांसह) भेटत असते आणि नजरेनेच ‘खा.’बद्दल विचारत असते ! ती नजर (म्हणजे काय बाप्पा...!) त्यांना बोचत असते. त्यामुळे ते आता जिद्दीला पेटले आहेत.

खरे तर याची सुरवात झाली ते महाराष्ट्र वर्तमानाच्या काळात. ते समयी (म्हणजे साधारण 1997 साली) भारतवर्षी सोनियाचा दिनु उगविला होता. या सोनेरी प्रकाशात न्हाऊन निघत श्री श्री कुमारस्वामी यांनी भारतभर त्या किरणांचा पिच्छा पुरविला आणि सार्‍या आयुष्याची लेखणी एका महिन्यात झिजविली. हे फिरणे इतके होते, की एखाद्यास कमरेची व्याधी जडावी.) हे महाराष्ट्र वर्तमान की सोनियाचा दिनविशेष हेच कोणाला कळेनासे झाले होते. याचा उत्तरार्ध म्हणून त्याच वेळी सोनियाचा उंबरा ओलांडून ‘खा.’ होता येईल असे त्यांना वाटो लागले. पण हाय रे रामा... (सॉरी. श्री श्री कुमारस्वामी यांना रामाची ऍलर्जी आहे.) हाय रे दैवा... (पुन्हा सॉरी. त्यांना दैववादाचीही ऍलर्जी आहे) जाऊ दे... मरू दे... बाईंना मराठी पेप्रं पाहण्याची रुची नव्हती आणि विंग्रजीतून निघणारे त्यांचे भावंड वर्तमान श्री श्री कुमारस्वामी यांचे ट्रान्सलेशन विंग्रजीत छापणेस तयार नव्हते. ते मुळे ती मेहनत मागे पडली. मग कालौघात श्री श्री कुमारस्वामींनी खूप मेहनत घेतली. कधी महाराष्ट्राचे वर्तमान वापरले तर कधी लोकांची सत्ता. कधी शेठजींचा पदर धरला तर कधी भोपाळसेठांचे धोतर. पण अद्यापपर्यंत उपेग काही झाला नाही. 

पण काळाच्या ओघात त्यांची धार (म्हणजे त्यांच्या लेखणीची धार) भाजप-संघाच्या बाबतीत खूपच तीक्ष्ण होत गेली. जे प्रमाणे मुंबईतील गटारांचा प्रश्न मांडताना ते पॅरिसच्या नाईटक्लबबाहेरील सांडपाण्याच्या व्यवस्थेचा आढावा घेतात तसेच दुष्काळ, दंगली, राजकारण, परीक्षेतील गैरव्यवहार, राजकारणातील भ्रष्टाचार, रस्त्यांची दुरवस्था, कूपनलिकेत अडकलेली बालके, हातपंपांचा प्रश्न, वाहनांमुळे वाढणारे प्रदूषण, अण्णांचे आंदोलन, कोकण रेल्वेमार्गावर कोसळणार्‍या दरडी, रेल्वेस्टेशनवरील चहाचा दर्जा या प्रत्येक गोष्टींचा संबंध ते संघपरिवाराशी जोडून त्याचा खरपूस समाचार घेऊ शकतात. याच मुद्‌द्यावर चिदंबरम गृहमंत्री होऊ शकतात तर आपण ‘खा.’ कसे होऊ शकत नाही, या विचाराने त्यांना सध्या पछाडले आहे म्हणे.

दिव्याचा प्रकाश पसरवताना पहिल्या दिवसापासून त्यांनी ही काळजी घेतली आहे. त्यामुळे अनेक वेळा चमत्कारिक स्थितीही उद्भवली. पण असे चमत्कार त्यांच्याच लीलेचे भाग आहेत. त्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य. पर्वा अण्णांच्या आंदोलनाला संघाचा पाठिंबा असल्याची खबर लागताच त्यांना परमसंतोष झाला आणि त्या संतोषाच्या भरात (आवेगात म्हणायचे होते) त्यांनी खरपूस अग्रलेख लिहून टाकला! अग्रलेखात भाजप, संघपरिवाराचा उल्लेख नसेल तर त्यांचा ऑपरेटर कामच करत नाही म्हणे!

मध्यंतरी मा. पंतप्रधानांनी निवडक संपादकांना चर्चेसाठी बोलावले तेव्हा श्री श्री कुमारस्वामी पहिल्या पाचात (म्हणजे निमंत्रित केलेल्या पाच जणांत पाचवे) आले. एक पत्रकार म्हणजे एक स्तंभ म्हणायचे झाले तर हा पाचवा स्तंभ. तर त्यांनी तेव्हाही आपल्यात पंतप्रधान अवतरल्याचे दाखवून देताना ‘खा.’ ची चव अनुभवण्याचा प्रयत्न केला. टीव्हीवर त्यांचे दर्शन सार्‍या मराठी जगाला जाहले.

टीव्हीवर आल्याशिवाय ‘खा.’चा मार्ग प्रशस्त होणार नाही म्हणून आता त्यांनी तार्‍यांच्या चौकटीत आपला चेहरा प्रकट करण्यास सुरवात केली आहे. या बदल्यात तार्‍यांच्या राज्यातील राजाला आपल्या कॉलमातील चौकट त्यांनी बहाल केली. दोघांचेही बरे चालले आहे, असे म्हणतात.

तर मूळ मुद्दा हा, की उद्या-परवा कॅन्सर उपचारांसाठी सुप्रसिद्ध असलेल्या रुग्णालयातून उपचार घेऊन बाईसाहेब परतल्या की श्री श्री कुमारस्वामी आपल्या अग्रलेखांची आणि रविवारच्या लेखांची आणि मागील 20 वर्षांतील लेखांची फाईल घेऊन भेटीला जाणार आहेत म्हणे. एवढ्या फायली पाहूनच बाईसाहेब त्यांना ‘खा’ म्हणतील अशी त्यांना आशा आहे. 

मागून आलेले अनेकजण पुढे गेले, महाराष्ट्राच्या वर्तमानातूनच गेले याचे त्यांना फार वाईट वाटते, असे त्यांची कामवाली सांगत होती. कामवालीला तिच्या मालकिणीने सांगितल्याचे कळते. त्यांची आमची कामवाली एकच. म्हणून आम्हाला हे वर्तमान कळले. असो. एक मराठी माणूस ‘खा.’ होणार असेल, तर राज ठाकरेंच्या खालोखाल आनंद आम्हाला होणार. या आनंदातच ही बातमी आपणापर्यंत पोहचविण्याचे आम्ही ठरविले.
आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे भोपाळकडे...

14 जुलाई 2011

आता सकाळ च्या वाचकांनाच भरली हुडहुडी...!

सकाळ मध्ये सध्या धमाल चालू आहे. मागे ३ जुलै रोजी 'आम्हाला वगळा...' हा अनंतराव भालेराव यांचा लेख जशाला तसा सकाळ च्या मुख्य अंकात आणि औरंगाबाद टुडे मध्ये दोन वेळा छापला गेला. आज पोस्ट खात्याची एक बातमी औरंगाबाद टुडेच्या पान ३ आणि पान ८ वर जशीच्या तशी छापून आली आहे. एकाच किमतीत दोन अंक न देता एकाच बातमी दोन वेळा छापण्याच्या या पत्रकारितेला काय म्हणायचे? पवार साहेब, नुसते बस थांबे रंगवून अंक विक्री वाढत नसते. अंक चांगला काढावा लागतो, मग लोक आपोआप विकत घेतात. मग १ रुपयात अंक देण्याची सुद्धा गरज उरत नाही...! 


10 जुलाई 2011

औरंगाबादकराना घडले भेटीच्या `भिक`वस्तूचे दिव्य दर्शन !

औरंगाबाद्करांची मर्जी जाणून घेण्याची चढाओढ काही महिन्यापूर्वी रंगली होती. मर्जीच्या या खेळात भोपाळसेठ यांनी २०० रुपयात दिव्यदर्शनाची ऑफर देऊन वाचकांची मर्जी जिंकली. त्याच वेळी तमाम वाचकांना एक भेटवस्तू देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. दिव्य दर्शनाच्या भाराने झुकलेल्या पब्लिकने खूप रेटा सुरु केल्याने अखेर या भेटवस्तू वाटण्याचे ठरवण्यात आले. 

लोकांना वाटले, कि मर्जी जाणून घ्यायला हे लोक दारोदार फिरले, मग भेट देण्यासाठी पुन्हा दारी येतील. पण हाय रे दैवा, या वेळी उलटेच घडले. दारीच काय, गल्लीत सुद्धा कोणी फिरकले नाही! समस्त गरजू भेटइच्छुकांनी आता आपल्या दारी येऊन भेट स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले. तब्बल २०० रुपयांच्या भेटीसाठी आतुरलेले हजारो जीव दिव्याखाली धावले... आणि काय सांगायचे महाराजा... सर्व जण अतिशय तृप्त झाले आहेत. 

भोपाळसेठ यांनी पार दूर देशीहून प्लास्टिकच्या ३ बरण्या आणि बायकांनी नाक पुसण्याचे ३ फडके असा साधारण ४० रुपयात खरेदी केलेला ऐवज आणून वाटण्यास सुरवात केली. ही मौल्यवान भीक स्वीकारण्यास सध्या दिव्याच्या अंगणात भल्यामोठ्या रांगा लागलेल्या आहेत. असली फालतू भिक स्वीकारण्यापेक्षा ती सोडून देण्याचे विचार लोक करतात पण पुन्हा - चोराची लंगोटी - म्हणून रांगेत उभे राहतात. 
रांगा लागल्या पण तिथे पावसापासून संरक्षण नाही. बिचारे ४० रुपयाच्या भिकेसाठी आपला लाखमोलाचा जीव अडकवून उभे आहेत. 

अशा प्रकारे वाचकांची मर्जी जाणून घेवून आता औरंगाबादेत आपलीच मर्जी चालविण्याचा प्रकार सुरु झाला असून उर्वरित महाराष्ट्रासाठी हा प्रेमाचा संदेश देण्यासाठी आम्ही हे लेखन केले आहे. यात कोणाची बदनामी करण्याचा आमचा हेतू नाही. त्यामुळे कोणीही आम्हाला कायदेशीर इलाज करण्याचा इशारा देयू नये, ही विनंती...!

2 जुलाई 2011

‘मराठवाडा’ बुडविल्याचे पाप लोकमत ने धुतले...!

आज सकाळी सकाळी आमचे मन प्रसन्न झाले. लोकमतने आपले जुने पाप आज धुवून टाकले. साधारण दोन दशकांपूर्वी मराठवाड्यात ‘मराठवाडा’ हे दैनिक छान चालत असे. कै. अनंतराव भालेराव यांच्या नेतृत्रावाखाली चालणारे हे वृत्तपत्र स्वातंत्र्यलढ्यापासून चालू होते. बाबूजींचे पत्र औरंगाबादेत आले आणि अव्यावहारिक मराठवाडा रसातळाला गेला. यांनी तिथली माणसे पळविली. बऱ्याच गमती-जमती केल्या आणि अखेर त्या दैनिकाचा श्वास थांबला.
कै. अनंतराव भालेराव हे या दैनिकाचे सर्वेसर्वा. ज्यांच्या लेखणीच्या दमावर वृत्तपत्र चालायचे असे खूप कमी पत्रकार झाले. आचार्य अत्रे, ग. वा. बेहेरे, अनंतराव भालेराव, विवेक घळसासी... अशी छोटीशी यादी तयार होते. अशा अनंतराव भालेराव यांचे समग्र लेखन २ खंडात आज प्रकाशित होते आहे.

अनंतराव हे मराठवाड्यातील पत्रकारितेतील पितामह. त्यांच्या या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने लोकमत ने आज पहिल्या पानावर ३ कोलम बातमी छापली आहे. एवढेच नवे, तर आतील पानावर व्यंकटेश केसरी यांचा अर्धे पान लेखही चपला आहे. हे सारे गोड धक्का देणारे आहे. पण एक विचार मनात येतो – हे पापक्षालन तर नव्हे? काहीही असो, पहिल्या नंबरच्या पेपरने असे छापणे आनंददायी आहे. पण हा ‘डीएम’ इफेक्ट तर नव्हे? काहीही असो, एका महान पत्रकाराला एवढी प्रसिद्धी देत त्यांनी दिलेल्या मान वंदनेला आम्ही दाद देतो.
या उलट मराठवाड्यात आपल्या दिव्याच्या प्रकाशाचा उजेड पडण्यासाठी आलेल्या पत्राने या वृत्ताला एका कोपऱ्यातली जागा दिली आहे. अनंतराव भालेराव यांना न ओळखणारी पिढी या पत्रात नोकरी करते आहे, असे दिसते. खरे तर पत्रकारितेतील प्रत्येकाने जे ग्रंथ विकत घेउन पारायणे करून काही शिकावे, अशा योग्यतेचा हा पत्रकार. त्यांच्याकडे असे दुर्लक्ष्य! हरी हरी. तरी एक बरे, त्यांचा निवासी संपादक एके काळी मराठवाडा दैनिकात काम करीत होता म्हणे...!
मग दिव्याने या बातमीवर प्रकाश का टाकला नाही बरे? काय भोपाळसेठ? आपण तर पगार भरपूर दिले आहेत म्हणे? या विषयात कुणाची काही अपेक्षा होती का? असे चीन्धीचोर आपल्याकडे आहेत का? तपास करा.










आणि, ही आहे दिव्याच्या प्रकाशातील इवलीशी बातमी.


अनंतराव हे मराठवाड्यातील पत्रकारितेतील पितामह. त्यांच्या या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने लोकमत ने आज पहिल्या पानावर ३ कोलम बातमी छापली आहे. एवढेच नवे, तर आतील पानावर व्यंकटेश केसरी यांचा अर्धे पान लेखही छापला आहे. हे सारे गोड धक्का देणारे आहे. पण एक विचार मनात येतो – हे पापक्षालन तर नव्हे? काहीही असो, पहिल्या नंबरच्या पेपरने असे छापणे आनंददायी आहे. पण हा ‘डीएम’ इफेक्ट तर नव्हे? काहीही असो, एका महान पत्रकाराला एवढी प्रसिद्धी देत त्यांनी दिलेल्या मान वंदनेला आम्ही दाद देतो.
या उलट मराठवाड्यात आपल्या दिव्याच्या प्रकाशाचा उजेड पडण्यासाठी आलेल्या पत्राने या वृत्ताला एका कोपऱ्यातली जागा दिली आहे. अनंतराव भालेराव यांना न ओळखणारी पिढी या पत्रात नोकरी करते आहे, असे दिसते. खरे तर पत्रकारितेतील प्रत्येकाने जे ग्रंथ विकत घेउन पारायणे करून काही शिकावे, अशा योग्यतेचा हा पत्रकार. त्यांच्याकडे असे दुर्लक्ष्य! हरी हरी. तरी एक बरे, त्यांचा निवासी संपादक एके काळी मराठवाडा दैनिकात काम करीत होता म्हणे...!
मग दिव्याने या बातमीवर प्रकाश का टाकला नाही बरे? काय भोपाळसेठ? आपण तर पगार भरपूर दिले आहेत म्हणे? या विषयात कुणाची काही अपेक्षा होती का? असे चीन्धीचोर आपल्याकडे आहेत का? तपास करा.

1 जुलाई 2011

बावचळलेल्या मालकाची वेठबिगारीची 'ऑफर'!

जेहत्ते काळाचे ठाई महाराष्ट्र देशी मराठी वृत्त सृष्टीमध्ये बहुत बावचळलेपणा भरलेला दिसतो आहे. भोपाळशेठ यांच्या अमराठी आक्रमणापुढे साऱ्या मराठी पुत्रांनी नांगी टाकली. ट्रायल भूमी औरंगाबाद मध्ये जबरदस्त मुसंडी मारून आता दिव्य प्रकाश साऱ्या महाराष्ट्र देशी पसरणार आहे. या प्रकाशात उजळून निघण्यासाठी नारदाचे वंशज सरसावले आहेत. याला कोणाही मालकाचे बंदे अपवाद नाहीत. ये कारणे, काळ्या पांढऱ्या दाढीमुळे औरंगाबादेत प्रचंड मोठे खिंडार पडल्याने त्रस्त झालेल्या मालकांनी शनिवारवाड्याच्या पाठीमागून एक मनोरंजक फर्मान काढले असल्याचे कळते. त्यांनी दिलेल्या या वेठबिगारीच्या ऑफरमुले पुण्यापासून नागपूरपर्यंत आनंदी आनंद पसरल्याचे वृत्त आहे. काय आहे या मध्ये? -
ऐका...
नवी पगारवाढ मिळण्याआधी कर्मचाऱ्यांनी एक करार करणे आवश्यक आहे. या नुसार तीन वर्षे आमचा पेपर सोडून कुट्ठे कुट्ठे जायचे नाही. (आम्ही नाही जा !) समजा, जायचेच झाले तर ३ महिन्याची नोटीस द्यायची. (कित्ती मज्जा) नाही तर ३ महिन्याचा पगार कापणार! आणि सर्वात महत्वाचे म्हणजे - बाहेर जायचे तर जा पण प्रतिस्पर्ध्याकडे जायचे नाही !!!! आता प्रतिस्पर्धी कोण, हे यात स्पष्ट नाही! प्रत्येक पेपर प्रतिस्पर्धी ठरू शकतो! मग काय? - मर मेल्या उपाशी!
साम्प्रतला समस्त उभ्या महाराष्ट्रात या नव्या वेठबिगारीची चर्चा चालू आहे. पगारवाढीआधी करारावर सही हवी, पण पगारवाढ किती, हे गुलदस्त्यात आहे. तीन वर्षे सोडायचे नाही, पण तीन वर्षे किती पगार वाढवणार, हे सांगणार नाही... काय करावे? कुठे जावे? 
पत्रकारांवरील या 'हल्ल्या'विरुद्ध कोणी आवाज उठविणार का हो एस. एम. सर?

25 जून 2011

आम्ही खूप घाबरलो आहोत

आज सकाळ पासून आम्ही खूप घाबरलो आहोत. मराठवाड्याचे पवित्र पत्र असलेल्या दैनिकात आमच्यावर कारवाई होणार असल्याचे वाचले, आणि आमचे हातपाय गळाले. त्यामुळे आम्ही हे लेखन डोक्याने करीत आहोत. आता आमच्या मनात एकाच विचार आहे, आमच्या बायका-पोरांचे काय होणार? परमेश्वरी कृपेने आम्हाला एक बायको, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. पुण्यात एका छोट्याशा सदनिकेत आम्ही राहतो. आमची सगळी ग्राच्युईती खर्चून १० टक्के कोट्यातून आम्हाला ही जागा मिळाली. त्याचे कर्जही अजून फिटले नाही. आम्हाला अटक झाली आणि आम्हाला तुरुंगात टाकले तर त्यांचे काय होणार? माझी आपणा सर्वाना जाहीर नम्र विनंती आहे, की मला माफ करा.

मी कोणाची बदनामी केली नाहीआम्ही पुण्यात बसतो पण देशभर असतो. आमच्यावर कारवाई झाली, तर मायावती, जयललिता यांची कामे कोण करणार? एक मराठी माणूस देशभर जाऊन नाव कमावतो हे किती महत्वाचे आहे!

अशा परिस्थितीत आम्ही मराठी वृत्तपत्र सृष्टीचा मनोरंजक आढावा घेत आहोत. असे करताना थोडे इकडे-तिकडे होतही असेल पण ते तर कुमार स्वामींच्या पहिल्या लेखातही झाले होते! तर असे हे होतच असते. त्याकडे दुर्लक्ष करावे आणि उदार मानाने आम्हाला माफ करून आमच्यावर कोणताही गुन्हा दाखल होणार नाही असे पहावे. यापुढे आम्ही कुण्णा-कुण्णावर टीका करणार नाही. काळी-पांढरी म्हणून डिवचणार नाही, श्याम म्हणून हिणवणार नाही, चक्रधर स्वामींचे लीळाचरित्र वाचणार नाही, ऋषी मुनी म्हणनार नाही, ये-पी संबोधणार नाही. डोंगरधारी असे चिडवणार नाही. आम्ही अगदी सरळ वागू. एख्याद्या क्राईम रिपोर्टरने एखाद्या पोलीसावाल्याशी वागावे, तसे आम्ही तुमच्याशी वागू. त्यासाठी ग्यारेंटर म्हणून आम्ही कुणाच्या सह्या आणायच्या हे तुम्हीच सांगा.

कृपया आमच्यावर कारवाई करू नका. आम्ही बालबच्चेवाले आहोत. पाठीवर मारा पोटावर नको.

आपलाच पण कुणाचाच नसलेला

बोरूबहाद्दर प्रेसवाले

23 जून 2011

मीडिया पर असली हमला तो पत्रकारों का भयंकर आर्थिक शोषण है

साभार :

यकीन मानिये, वेज बोर्ड के कारण कोई अखबार बंद नहीं होने जा रहा : सबका दर्द सुनने-सुनाने वाले पत्रकारों के बड़े हिस्से को श्रमजीवी पत्रकारों के वेतनमान पर रिपोर्ट देने वाले जस्टिस मजीठिया आयोग की वेज बोर्ड रिपोर्ट के बारे में कुछ मालूम नहीं होता, इसका लाभ मिलना तो दूर की बात है.

इसके बावजूद अखबार प्रबंधकों ने वेज बोर्ड को मीडिया पर हमला बताकर हल्ला मचाना शुरू कर दिया है. जबकि मीडिया पर असली हमला तो पत्रकारों का भयंकर आर्थिक शोषण है. आखिर इतनी कठिन परिस्थितियों में लगातार काम करके भी एक पत्रकार किसी प्रोफेसर, सीए, इंजीनियर, डॉक्टर, आइएएस या कंप्यूटर इंजीनियर से आधे या चौथाई वेतन पर क्यों काम करे? अभिव्यक्ति की स्वतंत्रता चाहिए तो यह सवाल हर नागरिक और हर मीडियाकर्मी को पूछना चाहिए. कोयलाकर्मियों और शिक्षक-कर्मचारियों की तरह मीडियाकर्मियों को भी अपने वेज बोर्ड के बारे में जागरूक होना चाहिए. वरना अखबार प्रबंधकों की लॉबी तरह-तरह से टेसुए बहाकर एक बार फिर पत्रकारों को अल्प-वेतनभोगी और बेचारा बनाकर रखने में सफल होगी.
आज जो अखबार प्रबंधक नये वेज बोर्ड पर आंसू बहा रहे हैं, उन्हें नहीं भूलना चाहिए कि उनके प्रोडक्ट यानी अखबार में जो चीज बिकती है- वह समाचार और विचार है. अन्य किस्म के उत्पादों में कई तरह का कच्चा माल लगता है. लेकिन अखबार का असली कच्चा माल यानी समाचार और विचार वस्तुतः संवाददाताओं और संपादनकर्मियों की कड़ी मेहनत, दिमागी कसरत और कौशल से ही आता है. इस रूप में पत्रकार न सिर्फ स्वयं कच्चा माल जुटाते या उपलब्ध कराते हैं, बल्कि उसे तराश कर बेचने योग्य भी बनाते हैं.
इस तरह देखें तो अन्य उद्योगों की अपेक्षा अखबार जगत के कर्मियों का काम ज्यादा जटिल होता है और उनके मानसिक-शारीरिक श्रम से कच्चा माल और उत्पाद तैयार होता है. तब उन्हें दूसरे उद्योगों में काम करने वाले उनके स्तर के लोगों के समान वेतन व अन्य सुविधाएं पाने का पूरा हक है. दुखद है कि मीडियाकर्मियों के बड़े हिस्से में इस विषय पर भयंकर उदासीनता का लाभ उठाकर अखबार प्रबंधकों ने भयंकर आर्थिक शोषण का सिलसिला चला रखा है.
जो अखबार 20 साल से महत्वपूर्ण दायित्व संभाल रहे वरीय उपसंपादक को 20-25 हजार से ज्यादा के लायक नहीं समझते, उन्हीं अखबारों में किसी चार्टर्ड एकाउंटेंट, ब्रांड मैनेजर या विज्ञापन प्रबंधक की शुरूआती सैलरी 50 हजार से भी ज्यादा फिक्स हो जाती है. सर्कुलेशन की अंधी होड़ में एजेंटों, हॉकरों और पाठकों के लिए खुले या गुप्त उपहारों और प्रलोभनों के समय इन अखबार प्रबंधकों को आर्थिक बोझ का भय नहीं सताता. चार रुपये के अखबार की कीमत गिराकर दो रुपये कर देने या महज एक रुपये में किलो भर रद्दी छापने या अंग्रेजी के साथ कूड़े की दर पर हिंदी का अखबार पाठकों के घर पहुंचाने में भी अखबार प्रबंधकों को गर्व का ही अनुभव होता है. लेकिन जब कभी पत्रकारों को वाजिब दाम देने की बात आती है, तब इसे मीडिया की स्वतंत्रता पर हमले जैसे हास्यास्पद तर्क से दबाने की कोशिश की जाती है.
आज इन मुद्दों पर एक सर्वेक्षण हो तो दिलचस्प आंकड़े सामने आयेंगे-
  • 1. किस-किस मीडिया संस्थान में वर्किंग जर्नलिस्ट वेज बोर्ड लागू है?
  • 2. जहां लागू है, उनमें कितने प्रतिशत मीडियाकर्मियों को वेज बोर्ड का लाभ सचमुच मिल रहा है?
  • 3. मीडिया संस्थानों में प्रबंधन, प्रसार, विज्ञापन जैसे कामों से जुड़े लोगों की तुलना में समाचार या संपादन से जुड़े लोगों के वेतन व काम के घंटों में कितना फर्क है?
  • 4. मजीठिया वेतन आयोग के बारे में कितने मीडियाकर्मी जागरूक हैं और इसे असफल करने की प्रबंधन की कोशिशों का उनके पास क्या जवाब है?
  • 5. जो अखबार मजीठिया वेतन आयोग पर चिल्लपों मचा रहे हैं, वे फालतू की फुटानी में कितना पैसा झोंक देते हैं?
जो लोग यह कह रहे हैं कि पत्रकारों को वाजिब वेतन देने से अखबार बंद हो जायेंगे, वे देश की आखों में धूल झोंककर सस्ती सहानुभूति बटोरना चाहते हैं. जब कागज-स्याही या पेट्रोल की कीमत बढ़ती है तो अखबार बंद नहीं होते. दाम चार रुपये से घटाकर दो रुपये करने से भी अखबार चलते रहते हैं. हाकरों को टीवी-मोटरसाइकिल बांटने और पाठकों के घरों में मिठाई के डिब्बे, रंग-अबीर-पटाखे पहुंचाने से भी अखबार बंद नहीं होते. प्रतिभा सम्मान कार्यक्रमों और महंगे कलाकारों के रंगारंग नाइट शो से भी कोई अखबार बंद नहीं हुआ. शहर भर में महंगे होर्डिंग लगाने और क्रिकेटरों को खरीदने वाले अखबार भी मजे में चल रहे हैं. तब भला पत्रकारों को वाजिब मजूरी मिलने से अखबार बंद क्यों हों? इससे तो पत्रकारिता के पेशे की चमक बढ़ेगी और अच्छे, प्रतिभावान युवाओं में इसमें आने की ललक बढ़ेगी, जो आ चुके हैं, उन्हें पछताना नहीं होगा. इसलिए यकीन मानिये, मजीठिया वेतन बोर्ड के कारण कोई अखबार बंद नहीं होने जा रहा. वक्त है पत्रकारिता को वाजिब वेतन वाला पेशा बनाने का. सबको वाजिब हक मिलना चाहिए तो मीडियाकर्मियों को क्यों नहीं?
एक बात और. पत्रकारों की इस दुर्दशा के लिए मुख्यतः ऐसे संपादक जिम्मेवार हैं, जो कभी खखसकर अपने प्रबंधन के सामने यह नहीं बोल पाते कि अखबार वस्तुतः समाचार और विचार से ही चलते हैं, अन्य तिकड़मों या फिड़केबाजी से नहीं. प्रबंधन से जुड़े लोग एक बड़ी साजिश के तहत यह माहौल बनाते हैं कि उन्होंने अपने सर्वेक्षणों, उपहारों, मार्केटिंग हथकंडों, ब्रांड कार्यक्रमों वगैरह-वगैरह के जरिये अखबार को बढ़ाया है. संपादक भी बेचारे कृतज्ञ भाव से इस झूठ को स्वीकार करते हुए अपने अधीनस्थों की दुर्दशा पर चुप्पी साध लेते हैं. पत्रकारिता का भला इससे नहीं होने वाला. समय है सच को स्वीकारने और पत्रकारिता को गरिमामय पेशा बनाने का, ताकि इसमें उम्र गुजारने वालों को आखिरकार उस दिन को कोसना न पड़े, जिस दिन उन्होंने इसमें कदम रखा था.

लेखक डा. विष्णु राजगढ़िया पटना और दिल्ली में ''समकालीन जनमत'' मैग्जीन के लिए काम कर चुके हैं. उसके बाद भोपाल के माखन लाल चतुर्वेदी राष्ट्रीय पत्रकारिता विश्वविद्यालय में व्याख्याता के बतौर काम किया. फिर प्रभात खबर के धनबाद संस्करण में स्थानीय संपादक और प्रभात खबर इंस्टीट्यूट के निदेशक रहे. नई दुनिया के झारखंड संस्करण के ब्यूरो चीफ के रूप में रांची में कार्यरत.

20 जून 2011

‘सल्लागार’ म्हणजे काय रे भाऊ?

(आम्ही नुकतेच औरंगाबाद नगरीत जाऊन आलो. तेथील एका ग्रुपमध्ये एक मजेदार गोष्ट ऐकण्यास मिळाली. ती आपणासमोर सादर...)

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. नेहेमीप्रमाणे मध्यरात्री तो स्मशानात पोहोचला. काळोखात सळसळणार्‍या पिंपळाच्या फांदीवर उलट्या लटकणार्‍या वेताळाला त्याने खाली खेचले आणि एका झटक्यात त्याला खांद्यावर टेकून तो स्मशानाच्या बाहेर निघाला. वेताळ खरे तर आता म्हातारा झाला होता. मागच्या अनेक पिढ्यांच्या साक्षीने राजा विक्रमादित्य त्याला खांद्यावर टाकून बाहेर पडत असे आणि आपल्या खाशा युक्तीने त्याच्या तावडीतून सुटून तो परत आपल्या आवडत्या पिंपळावर येऊन लटकत असे. 
आजही तसेच झाले. बाहेर पडताच विक्रमादित्याने आपल्या बुलेटला किक मारली. रात्रीच्या भयाण अंधारात फायरिंगचा ‘डुग डुग डुग’ असा भेसूर आवाज करीत बुलेट शहराच्या दिशेने निघाली. विक्रमादित्याने आज काहीही न बोलण्याचा निश्चय केला होता. कारण त्याने तोंड उघडले तर वेताळ पुन्हा एकदा हातातून सटकून जाईल, याची त्याला खात्री होती. वेताळ नेहेमीप्रमाणे विक्रमादित्याच्या कानाशी झुकला आणि त्याने विचारले, ‘‘हे विक्रमादित्या, तू तुझा हट्ट सोडत नाहीस आणि मी माझा क्रम चुकत नाही. तुला ठावूक असतानाही माझ्या प्रश्नाचे खरे उत्तर दिले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायाशी लोळू लागतील.’’ त्याच्या धमकीला विक्रमादित्य आजही घाबरला नाही. त्याने आपली बुलेट रस्त्याच्या कडेला घेतली आणि एका बस स्टॉपशेजारी उभी केली. दोघेही बस स्टॉपच्या आतील आसनावर येऊन बसले. 

वेताळ म्हणाला, ‘‘हे विक्रमादित्या, आजकाल सर्वत्र ‘सल्लागार’ या पदाची खूप चलती आहे. कोणत्याही पदामागे हे नाव लावून काही जण लक्षावधींची कमाई करीत आहेत. हे ‘सल्लागार’ कसे जन्मतात? कसे बनतात? तसे होण्यासाठी कोणते कौशल्य लागते? ते मिळविण्यासाठी काय मेहनत करावी लागते? याची उत्तरे तुला ठावून असतील तर मला सांग. खोटे बोललास, तर तुझ्या डोक्याची....’’

त्याचे बोलणे मध्येच अर्धवट तोडत विक्रमादित्य म्हणाला, ‘‘हे वेताळा, आता तुझे ब्लॅकमेलिंग बस्स झाले. मला ब्लॅकमेल करण्यास तू पत्रकार आहेस की ‘आरटीआय’चा कार्यकर्ता? तुला उत्तरच हवे आहे, तर मी देईन. माझ्या डोक्याची शकले करून घेण्याची माझी इच्छा नाही. ऐक तुझ्या प्रश्नाचे उत्तर. पण हे उत्तर मी तुला एका गोष्टीच्या रूपाने देणार आहे. ही इसापनीतीतील गोष्ट आहे. त्यामुळे प्राणी कसे काय बोलू शकतात वगैरे फालतू प्रश्न मला विचारू नकोस.’’
वेताळ म्हणाला, ‘‘विक्रमादित्या, मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले की बस्स झाले. उगाच हट्टीपणा करण्यासाठी मी रामदेव थोडाच आहे? चल बोल...’’

विक्रमादित्य सांगू लागला ः
एक छानसं कुरण होतं. तिथं अनेक गायी आणि बैल गुण्यागोविंद्याने नांदत असत. सर्वजण तेथे एकसमान होते पण त्यातील काही जण विशेष होते. स्वतःला धष्टपुष्ट समजणारा एक बैल त्या कळपात होता. आपल्या कळपातील नव्या, गुणवान गोवंशाचा जनक आपणच, असा दावा तो करीत असे. आपल्या वीर्यवान वृत्तीमुळेच आपल्या कळपाची भरभराट होत असल्याचे त्याचे म्हणणे होते. आपण चांगलेच पुष्ट असल्याची त्याची बतावणी अशी होती की त्या कुरणाच्या मालकाला त्याच्यावर भलताच लोभ जडला. आपल्या कुरणात अधिक चांगल्या वंशाची पैदास व्हावी यासाठी या बैलाचा उपयोग करण्याचे त्याने ठरविले. या बैलाचा अधिक चांगल्या प्रकारे पुष्ट करण्यासाठी त्याने या बैलाला आपल्या महालातील खास गोठ्यात आणून बांधले. त्याला उत्तम खुराक सुरू केला. हाच बैल आपल्या कळपाचा उद्घार करील, याची त्याला खात्री वाटत होती. कृत्रिम रेतनाद्वारे त्याच्या वीर्याचा उपयोग करण्यासाठीही मालकाने तयारी चालविली होती. पण हाय रे दैवा, दोन-चार वर्षे उलटली, तरी या बैलाद्वारे गोवंशवृद्धी होईना. आधी त्याला वाटले, आपल्या गोधनातच काही फॉल्ट असेल. पण तपासणीअंति हे बैलोबा बिन‘कामा’चे असल्याचे मालकाच्या लक्षात आले. मग मालकाने त्याला गोठ्याबाहेरच काढले.

भुकेजलेला हा बैल नव्या कुरणाच्या शोधात निघाला. निघण्याआधी मात्र त्याने एक शक्कल लढविली. आपल्या तमाम जातभाईंना आणि इतर कळपांना, आता आपण अधिक चांगल्या कुरणाच्या शोधात निघण्यासाठी सध्याच्या कुरणाचा त्याग करीत आहोत, अशी बतावणी त्याने केली. ज्यांनी हे ऐकले, त्यांना या विषयाशी फारसे देणेघेणे नव्हते!

तर, हा बैलोबा रान हुंंगत हुंगत पुढे निघाला. तसे पाहिले, तर त्याने जागोजागी तहानलाडू-भूकलाडूचे गुप्त साठे करून ठेवले होते, त्यामुळे भूक लागली की भूक भागत होती. पण साठे किती दिवस पुरणार? काही दिवसातच त्याचे फाके पडू लागले. तो रोडावू लागला. तशातच एक छोटे कुरण त्याला लागले. सध्याची भूक तर भागली. पण मोठ्या कुरणाचे आकर्षण त्याला गप्प बसू देई ना. मध्येच एखादा फेरफटका मारण्यासाठी तो बाहेर पडे. 

एके दिवशी असेच झाले. तो बाहेर पडून अंमळ दूरच पोहोचला. खूप दूरवर त्याला एक हिरवेगार कुरण दिसलेे. एवढे सुंदर कुरण त्याने कधीच पाहिले नव्हते. त्याच्या मनातील आशेला पालवी फुटली. आपल्या दुडक्या चालीने तो कुरणाच्या रोखाने निघाला. कुरण जवळ जवळ येऊ लागले. आहाहा... काय ते कुरण. हिरवे गार. जिकडे पाहावे तिकडे हिरवळ. थंडगार स्वच्छ पाण्याचे जागोजागी साठे. गवतात तरी किती प्रकार. तो आणखी जवळ आला. पाहतो, तर काय... छान, धष्टपुष्ट गायी या कुरणात स्वच्छंदपणे मौजमस्ती करीत चरत होत्या. त्याच्या जिभेला पाणी सुटले. मस्त हिरवेगार गवत खाऊन खूपच दिवस झाले होते. नव्हे, वर्षे लोटली होती. इथे तर इतके पौष्टिक गवत होते, की खाई त्याला खवखवे! सोबत थंडगार पाणी आणि साथीला पुष्ट गायींचे मनोरंजन...! तो कुरणाच्या आणखी जवळ आला. आता मात्र त्याला राहवेना. तो धावतच सुटला. पण हे काय...? कुरणाच्या सीमेवर काटेरी तारांचे कुंपण? अरे देवा... घात झाला. आता काय करायचे? समोर हिरवेगार कुरण. छानसे पाण्याचे साठे. पुष्ट गायींची सोबत आणि वाटेत हे अभद्र काटेरी कुंपण? त्याची चाल थांबली.

तो विचारात पडला. आता काय करायचे? कुंपण चांगले शिंगाइतके उंच होते. तो तिथेच थांबला. इकडेतिकडे पाहू लागला. काही वेळातच, एक म्हातारा बैल त्याच्याकडे येत असल्याचे त्याला दिसते. त्याला हायसे वाटले. बरे झाले, सोबत झाली... थोड्या गप्पा मारू... थोडा विचार करू आणि मार्ग काढू असे त्याने ठरविले. 

म्हातारा बैल जवळ आला. त्याने आस्थेवाईकपणे बैलोबाची विचारपूस केली. हवापाण्याच्या गप्पा झाल्या. म्हातार्‍या बैलाने हळूच विचारले...‘समोरचे कुरण आवडले?’... बैलाबाने लाजून मान हलविली, तसा त्याच्या गळ्यातील घुंगरांचा मंजूळ ध्वनी सार्‍या शिवारात घुमला.

‘कुरण आवडले, की गायी?’... म्हातार्‍या बैलाने विचारले, तसा बैलोबा आणखीच लाजला. एव्हाना त्याच्या पौरुषाची चलबिचल सुरू झाली होती! सुष्ट कुरण... पुष्ट गायी... पण दुष्ट कुंपण. त्याला राग आला. पण क्षणभरच. पुन्हा एकदा पौरुषाची चलबिचल सुरू झाली.

म्हातारा बैल म्हणाला, ‘माझ्याजवळ एक आयडिया आहे.’
बैलोबा उतावीळपणा लपवत म्हणाला, ‘सांगा ना.’
म्हातारा बैल म्हणाला, ‘एक काम कर. वीस पावले मागे जा. जोराने धावत सूट. कुंपण 10 फुटांवर आले, की जोराची झेप घे. तू थेट कुरणात जाशील.’

बैलोबा मोठ्या खुशीत पावले मोजत निघाला. वीस पावले जाताच थांबला. गर्रकन मागे वळला. मोठ्या खुशीने मान हलविली. घुंगरांचा आवाज घुमला. खुराने जमीन उकरीत बैलोबा धावत निघाला... प्रचंड वेगाने धावत धावत तो कुंपणापासून 15 फुटांपर्यंत पोहोचला आणि करकचून ब्रेक लावल्यागत जागीच थांबला. जागीच थांबल्याने त्याचे खूर जमिनीत घुसले होते. म्हातारा बैल पुन्हा जवळ आला. बैलोबा म्हणाला, ‘कॉन्फिडन्स येत नाही.’ म्हातारा बैल म्हणाला, ‘आणखी दहा पावलं मागे जा.’ पुन्हा तोच क्रम. पुन्हा करकचून ब्रेक! इकडे पौरुषाची चलबिचल वाढली होती. आकार बदलू लागला होता. जुन्या काळी जनावरांच्या दवाखान्यात नैसर्गिक रेतनासाठी आणलेल्या खास बैलाची जशी अवस्था असायची, तसे बैलोबाचे पौरुष आता डोकावूही लागले होते. 

आता त्याने ठरविले, थांबायचे नाही. इनफ इज इनफ. एव्हाना बैलोबा 60 फुटांपर्यंत पोहोचला होता. त्याने आता ठामपणे ठरविले. सारी शक्ती पणाला लावली. तो अतिप्रचंड वेगाने धावत निघाला. पन्नास... चाळीस... तीस... वीस... पंधरा... दहा... पाच... चार... हाय जंप...झूंऽऽऽ... फटाक्‌.... आई गं... मेलो...

सारा सत्यानाश झाला... हाय जंप थोडीशीच तोकडी पडली. काटेरी जाळीत पौरुष अडकले... पार नासाडी झाली... सारं अंग काटेरी तारांवरून सोलवटून निघालं आणि त्यातही आणखी दुर्दैव म्हणजे बैलोबा अलिकडेच पडले... कुरण राहिले दूर... कुरणाचा लोभ... पुष्ट गायींचे दर्शन... काटेरी तारा... म्हातारा बैल.... लॉंग रन... हाय जंप....झूंऽऽऽ... फटाक्‌.... आई गं... मेलो... पुन्हा पुन्हा बैलोबाच्या नजरेसमोरून हा सारा क्रम एखाद्या चित्रफितीसारखा दिसत होता... वेदनांनी अंग ठणकत होते. पौरुष तर लुप्तच झाले होते... फक्त रक्ताचे ओघळ दिसत होते...

म्हातारा बैल जवळ आला. आस्थेवाईकपणे डोक्यावरून जीभ फिरवीत त्याने सौम्यपणे विचारले, ‘खूप लागलं का रे बाळा?’ ... आता बैलोबाला रडू आवरत नव्हते. तो मुसमुसून रडू लागला. म्हातारा बैल धीराचा होता. त्याने शेजारी जाऊन फर्स्ट एड बॉक्स आणला. जुजबी मलमपट्टी केली. ‘टीटी’चं इंजेक्शन दिलं. पाठीने आधार देत त्याला थोड्याशाच अंतरावर असलेल्या एका पाणीसाठ्याजवळ नेले. चार घोट घशाखाली उतरताच त्याला बरे वाटते. म्हातारा बैल त्याला धीर देऊ लागला. असे अपघात होतच असतात, धीराने घ्यायचे... असे सांगू लागला.

आता मात्र बैलोबाचा संयम सुटला. मनापासून कातावून तो म्हणाला... ‘ते सगळं ठीक आहे. पण आता माझ्या आयुष्याचं नुकसान झालं ना ! सगळं ठेचलं गेलं. आता मी काय कामाचा?’

म्हातारा बैल म्हणाला, ‘अरे. आताच तर तू जास्त कामाचा. आजपासून तू कन्सल्टंट... सल्लागार. आता आपण दोघं मिळून पार्टनरशीपमध्ये नव्या पिढीला सल्ले देण्याचं काम करू...!’

वेताळाला सारा अर्थ कळला. पण विक्रमादित्याने मौनाची अट तोडली होती त्यामुळे काहीच न बोलता वेताळ भुर्रकन उडून निघून गेला. विक्रमादित्य डोके गच्च धरून बसला...!

15 जून 2011

लेखक पळवापळवीचे विपर्यस्त वर्तमान

-विश्वास पाटील 
' लेखकांची पळवापळवी' या गेल्या पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या प्रकाशन व्यवसायातील वादावरील लेखाला लेखकांच्या बाजूने दिलेले उत्तर... 
(म टा 12 जून २०११) 
.............................................
गेल्या रविवारी आमचे मित्र मुकुंद कुळे यांनी मराठीतील लेखकांच्या पळवापळवींचे विपर्यस्त वर्तमान दिले आहे. ते बरेचसे वस्तुस्थितीला सोडून व ऐकीव गप्पांवर रचलेले आहे. एखादा साहित्यिक म्हणजे कोणा एकाच्या गोठ्यात बांधलेली गाय नसते. जर बाईंडरचा टाका ढिसाळ असेल अगर कागदवाला काळपट कागद पुरवत असेल तर तो बाईंडर वा कागदवाला बदलण्याचा जसा अधिकार प्रकाशकाला असतो, त्याच प्रकारे एखादा प्रकाशक वेळेत ग्रंथाच्या नव्या आवृत्त्या प्रकाशित करत नसेल, वर्षानुवषेर् रॉयल्टी बुडवण्याचाच धर्म पाळत असेल तर असा प्रकाशक बदलण्याचा पूर्ण अधिकार लेखकाला आहे. 

विशेषत: श्री. कुळे यांनी माझ्याबाबत केलेली विधाने चुकीची आहेत. प्रकाशन क्षेत्रातील कोणीतरी त्यांना ही माहिती खोडसाळपणे दिलेली दिसते. श्री. मेहता यांनी मला पळवायचा प्रश्नच उद्भवत नाही. आजही मी 'राजहंस प्रकाशन'चाही लेखक आहे. राजहंसने प्रकाशित केलेल्या माझ्या सर्व कादंबऱ्या त्यांच्याकडेच असून आमच्यातील व्यवहार व मैत्री तशीच दृढ आहे. 'संभाजी'बाबत जी दहा लाखाची गोष्ट कुळे सांगतात, ती कहाणी 'महानायक'ची. १९९७मध्ये माझ्या 'महानायक'साठी रॉयल्टीची आगाऊ रक्कम म्हणून श्री. अनिल मेहता यांनी दहा लाख रुपये देऊ केले होते. त्या गोष्टीस माधव गडकरी, शंकर सारडा व सदा डुंबरे हे साक्षीदार होते. मात्र मी त्या कादंबरीचे हस्तलिखित आधीच श्री. माजगावकर यांच्याकडे दिले असल्यामुळे कितीही मोठ्या रकमेला भुलून ते परत घेणे; मला सदाचाराचे वाटले नाही. तसेच 'संभाजी' पुढे नऊ वर्षांनी, २००६मध्ये प्रकाशित झाली. तेव्हा ती अन्य प्रकाशकाकडे द्यायचा निर्णय माझा स्वत:चा आहे. त्यासाठी मला भेटलेल्या तीन प्रकाशकांमधून मी स्वत:च श्री. सुनिल मेहता यांची निवड केली. माझी एखादी कादंबरी मी कोणाला एकरकमी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 'संभाजी' कादंबरीचे अंतरंग माहित नसतानाही माझ्या शब्दांवर भरवसा ठेऊन अकरा हजारांहून अधिक वाचकांनी प्रत्येकी ३८० रुपयांप्रमाणे अॅडव्हान्स बुकिंग केले होते. आयकर विभागाकडे सादर केलेल्या कागदपत्रांची साक्ष काढून सांगायचे तर आत्तापर्यंत सात मोठ्या आवृत्त्या प्रकाशित होवून 'संभाजी' या माझ्या एकाच कादंबरीची एकूण सत्तावीस लाख अठ्ठेचाळीस हजार तीनशे सदतीस रुपयांची रॉयल्टी मला धनादेशाद्वारे प्रकाशकांकडून प्राप्त झाली आहे. माजगावकर आणि मेहता या दोन्ही प्रकाशकांकडे मी सुखी आहे. 

एका प्रकाशकाकडून आपले ग्रंथ काढून दुसऱ्या प्रकाशकाला देणे, या पळवापळवीचा पहिला बळी मी असल्याचे श्री. कुळे जाहीर करतात. मात्र श्री. रणजित देसाई यांनी आपल्या हयातीमध्येच आपले ग्रंथ मेहतांना तर पु. ल. देशपांडे यांनी आपले बरेच ग्रंथ दुसऱ्यांकडून काढून मधूकाकांना दिले होते. त्यामुळे अशा तथाकथित पळवापळवीही पहिल्या बळीचा मान माझ्या वाट्याला येत नाही. या निमित्ताने रणजित देसाईंनी सांगितलेला किस्सा आठवतो. ते एकदा म्हणाले होते, 'माझी 'स्वामी'सारखी कादंबरी मागणी असूनही सलग आठ वर्ष बाजारात उपलब्ध नव्हती. मग मी लिहितो ते माझ्या वाचकांसाठी की प्रकाशकांच्या लहरीसाठी असा प्रश्न पडतो!' 

अकारण पहिला बळी (मासे पुस्तक काढून मी दुसऱ्या कोणाला देण्याचा तथाकथित अपराध केला नसतानाही) मला ठरवले गेले आहेच, तर या निमित्ताने चार गोष्टी स्पष्ट लिहिण्याचा गुन्हा मी करतोच. तसे कोणीतरी या विषयाला वाचा फोडणे आवश्यक होतेच. फक्त मराठीतीलच नव्हे तर अनेक भारतीय भाषेतील साहित्यिक व कवी प्रकाशकाकडे लाखात येणे असताना हलाखीत मृत्यू पावल्याची अनेक उदाहरणे आहेत. अलीकडेच मराठीतील एका मातब्बर लेखकांना डायलिसीसवर असतानाही व त्यांचे लाखात येणे असतानाही ऐन वेळी त्यांना आपले हक्काचे मानाचे धन मिळालेच नाही. लेखकाने फक्त मानसन्मान, वार्धक्यात विविध मंडळांनी दिलेले आणि एका रात्रीत सुकून जाणारे हार याच्यावरच जगायचे? त्याने किंवा त्याच्या वारसाने प्रकाशकादारी जावून घाबरत घाबरत रॉयल्टी मागायची? काव्यसंग्रह खपतच नाहीत असे जणू त्रिकालाबाधित गृहीत मनी धरायचे, तर दुसरीकडे विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात, झेडपी, राजाराममोहन रॉय ट्रस्टमध्ये कवींची नावे वापरून खूप काव्यसंग्रह खपवायचे. अन् मानधनाच्या पंगतीतून कवींना कायमच रिकाम्या दोण-पत्रावळीवरून तसेच उठवायचे हे प्रकार सर्रास चालू आहेत. 

श्री. अरुण जाखडे व श्री. मुकुंद कुळे यांनी प्रकाशकाची 'कल्पकता - प्रयोगशीलता' व 'लेखक घडवणे किंवा लेखकावर मेहनत घेण्याची' मिठ्ठास भाषा केली आहे. याचाच दुसरा अर्थ असा की, जणू वि. स. खांडेकर, रणजित देसाई आणि व्यंकटेश माडगुळकर अशा लेखकांचा जन्म केवळ प्रकाशकीय मेहरबानीवर झाला होता असे समजायचे काय? अशाच तुमच्या प्रकाशकीय कल्पकतेतून व प्रयोगशीलतेतून वरील तीन लेखकांच्या ताकदीचा किंवा आवाक्याचा एखादा तरी लेखक श्री. जाखडे यांनी घडवून दाखवावा, आम्ही त्यांचे जन्माचे ऋणी राहू. लेखकाचे वेळच्या वेळी मानधन देणाऱ्या काही चांगल्या प्रकाशन संस्था मराठीत आहेत. मात्र अशांची संख्या खूपच कमी. 

एकीकडे प्रकाशन व्यवसाय टिकला पाहिजे याचा अर्थ दुसरीकडे स्वत:च्या हक्काच्या मानधनाला वंचित राहून लेखकाने दारिद्यातच श्वास सोडायला हवा असा होत नाही. श्री. कुळे यांच्या लेखात 'जुने लेखक नैतिकमूल्यं जपणारे', 'पुढच्या पिढ्या मात्र सॉफ्ट टागेर्ट', 'ग्रंथव्यवसायाचे पावित्र्य', 'नैतिकता' अशी उच्च शब्दांची मांदियाळी मांडली गेली आहे. पण वास्तव मात्र भयानक आहे. एका महान लेखकाच्या अंत्यविधीला हजेरी लावण्यासाठी प्रकाशन व्यवसायाला वळण देणारे एक मातब्बर प्रकाशक एका जिल्ह्याच्या गावी गेले होते. तेथे त्यांनी हॉटेलात दोन दिवस मुक्काम केला. अन् त्या दोन दिवसांचा निवासखर्च त्या मृत लेखकाच्या रॉयल्टीतून वजा केल्याचे लेखी पत्र लेखकाच्या वारसांना तात्काळ धाडले गेले. मात्र गेल्या दोन-अडीच दशकांत प्रकाशकबुवांनी त्याच मृत लेखकाच्या शिल्लक मानधनांपैकी एकही छदाम अद्यापि दिलेला नाही. 

केवळ साहित्यसेवेची भाषा, साहचर्य वा पावित्र्याच्या बातांवर जनव्यवहार चालत नाहीत. सैनिकांप्रमाणेच लेखकालाही पोट असते. खपाच्या मोजक्या लेखकांचे मानधन देऊन इतरांचे बुडवणे असाही याचा अर्थ होत नाही! अनेक थोर वाङ्मयसेवकांनी आपल्या संसाराकडे, मुलाबाळांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले. अहोरात्र शब्दांशी जणू संसार मांडला. समाजाने त्यांना नानासाहेब, अण्णासाहेब, तात्यासाहेब, भाऊसाहेब अशा बिरुदावल्या देऊन मानपान दिले. त्यांचे ग्रंथ वर्षानुवषेर् खपत राहिले. मानधन बिचारे तसेच साचत राहिले. त्याचा ओघ लेखकांच्या उंबरठ्यापर्यंत पोचलाच नाही. मग व्याख्याने, स्नेहसंमेलने, काव्यवाचन तर कोणी कथाकथन करायचे. प्रेमाने मिळालेल्या त्या तुटपुंज्या रकमेवर कष्टाने संसार चालवायचे. अशा महाराष्ट्र भटकंतीचा अनेकांच्या आरोग्यावर पुन्हा परिणाम झालाच. तर अनेकांनी पुस्तके खपत असतानाही रॉयल्टीच्या रकमेवर फाजील भरवसा न ठेवता कोणी मास्तरकी तर कोणी प्राध्यापकी स्वीकारून अंगातल्या साहित्यसेवेच्या झटक्याला वेळेतच मुरड घातली, अशांच्या कुटुंबियांचे भाग्य थोरच मानायचे. 

श्री. कुळे म्हणतात त्याप्रमाणे प्रकाशन क्षेत्रात त्सुनामी आल्या असतील तर अशा अनिष्ट प्रवृत्तींशी संघर्ष करायलाच हवा. त्या लढ्यामध्ये उतरायला अनेक कवी व लेखक मित्रांनी माझ्याकडे संमती दर्शवली आहे. मात्र या संघर्षाची सुरुवात करण्यापूवीर् मराठीतील प्रकाशक मित्रांंनी किमान कागदावर दाखवलेल्या वर्षानुवषेर् तुंबलेल्या वा नजरचुकीने राहून गेलेल्या सर्वच लेखकांच्या रॉयल्टीच्या रकमा चुकत्या कराव्यात, म्हणजे आपल्या नैतिक संघर्षाला खऱ्या अथीर् धार चढेल. 

केवळ मराठी प्रकाशन व्यवसायाच्या जोरावर अनेकांनी माड्या-हवेल्या उभारल्या. त्यांच्या त्या यशकर्तृत्वाबद्दल माझ्या पोटात दुखायचे कारण नाही. पण या महालांचे चिरे रचताना अनेक साहित्यिकांनी आपले रक्त, घाम आणि अश्रू वेचले आहेत. 

अलीकडे मी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलेला एक भयंकर प्रसंग आठवतो. ज्या एका महान मराठी साहित्यिकाने मराठी भाषेलाच नव्हे, तर भारतीय साहित्याला वळण दिले. ज्यांच्या कादंबऱ्यांवर आमच्या काही पिढ्या पोसल्या, त्या कादंबऱ्यातील नायक-नायिकांची नावे जनांनी आपल्या मुलांना ठेवली. अशा थोर लेखकाच्या वारसदारांनी त्यांचा मौल्यवान ग्रंथसंग्रह, त्यांना भेटीदाखल अन्य भाषेतील लेखकांनी दिलेले ग्रंथराज रद्दीत विकत घातले. आपल्या युगप्रवर्तक पित्याचा असा अमूल्य ग्रंथसंग्रह रद्दीत काढताना त्यांच्या मुलांना काय कमी दु:ख झाले असेल? पण तीस-तीस वर्ष मानधनाचा छदाम मिळणार नसेल तर ते बापुडे तरी दुसरे करणार काय! सुदैवाने माझ्या मानसिंग कुमठेकर नामक एका जागरुक ग्रंथप्रेमी मित्राच्या निदर्शनास ही बाब वेळीच आली. त्याने दामदुपटीने तो ग्रंथसंग्रह विकत घेतला आहे. मोठ्या पावित्र्याने आपल्या घरी जिवापाड जपला आहे. मायमराठीच्या त्या अग्रगण्य कादंबरीकाराला भगवान बुद्ध आणि हिटलर - अहिंसा आणि हिंसा या विषयावर एक दीर्घ पल्ल्याची कादंबरी लिहायची होती. त्यासाठी त्यांनी काढलेली टाचणे, त्या टिपण्या आणि आराखडे त्याच ग्रंथसंग्रहाच्या पिवळ्या, जुनाट पानाआड जेव्हा मला आढळून आले तेव्हा मला अश्रूंचा बांध आवरता आला नाही! ही घटना कपोलकल्पित वाटत असेल तर टीव्हीचा कॅमेरा सोबत घेऊया. आधुनिक युगात खऱ्या अथीर् माझ्या मराठीचा वेलू गगनावर नेणाऱ्या त्या थोर साहित्यिकाचा केवळ नशिबाने वाचलेला तो ग्रंथसंग्रह श्री. मुकुंद कुळे आणि श्री. अरुण जाखडे या दोघांना प्रत्यक्ष नेऊन दाखवायची माझी तयारी आहे. 

<http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8818374.cms>

4 जून 2011

स्वर्गलोकीचा नवा 'बाय लॉ'

नारद महर्षींच्या तमाम वंशजांना जेहत्ते कालाचे ठायी कलियुगी औरंगाबाद उर्फ संभाजीनगर उर्फ खडकी ग्रामी रुजू जाहल्याबिगर मोक्ष मिळणार नाही असा ‘बाय लॉ’ सांप्रतात स्वर्गलोकी झाला आहे काय, ऐसी शंका यावी असे वातावरण सध्या अखिल महाराष्ट्रभर पसरले आहे. कोणीही उठतो अन्‌ औरंगाबादी सुटतो. हा काय प्रकार असावा बरे? भोपाळसेठांनी ‘कुमार’ आणला की ऋषिमुनींनी त्यामध्ये भर टाकत ‘भरत कुमार’ आणावा... काय बरे हे गुपित असावे? ही काय कुरघोडी करणेची पद्धती झाली? की एकाने ‘आम्ही निःपक्ष’ अशी आरोळी ठोकली की दुसर्‍याने ‘आम्ही सर्वपक्ष’ म्हणत सगळ्या पक्षांचा गोतावळा जमा करायच्या मागे लागायचे? आमच्या दुकानात भाजप आहे, शिवसेना आहे, भाकप आहे, माकप आहे, राष्ट्रवादी आहे आणि कॉंग्रेस तर आमच्यातच आहे...! छान आहे बरें...!

नाशकात दिवे पेटणार...!
असो. आमचे अनुपस्थितीत महाराष्ट्रदेशी बरेच काही घडते आहे. घडले आहे. नाशिक श्रीक्षेत्री दिव्याचा प्रकाश लवकरच फाकणार असलेले वृत्त आहे. तेथील सर्व्हे पूर्ण होत आले असून लवकरच प्रत्यक्ष कामास सुरवात होणार असल्याचे वृत्त आहे. साहजिकच जळगाव-धुळे-नंदुरबार पट्‌ट्यातही लगोलग प्रकाश फाकू लागेल. तिकडे औरंगाबादी दिवा पेटविण्यास साक्षात देशाचे गृहमंत्री आले... काय सांगावे महाराज - साक्षात गृहमंत्री! आजकाल त्यांच्याकडे बराच वेळ दिसतो. पण त्यांचे निमित्त चुकले. एका पेपरच्या प्रकाशनाला आल्याने इतर पेपरवाल्यांनी ती बातमी ‘किल’ केली. वृत्तपत्रसृष्टीसाठी किती अभिमानाची गोष्ट आहे ना ही? देशाचा साक्षात गृहमंत्री आपल्या शहरात प्रथम येतो आणि त्याची दखलही ठळकपणे घ्यायची नाही... बहुदा वाचकांची मर्जी सांभाळण्याचीच ही रीत असावी. किंवा मग विष्णु भागवताचे पुराण लावायलाच जागा पुरत नसल्याने अशा ‘फालतू’ बातम्यांना स्थान उरत नसावे! तर मंडळी, नाशकातील दिवे लागण्याआधी जालना, बीडमधील दिवे प्रकाशणार आहेत म्हणे. मग नाशिक-धुळे-नंदूरबारचा पट्टा. त्यानंतर पुणे आणि मग अंबाबाईचे कोल्हापूर... होश्शियार.

बहन मायावतींचा विजय असो?
आम्ही तिकडे यूपीत होतो. परमआदरणीय मायावतीबहन यांच्या आदेशावरून एका भव्य स्थळी आमची निवास-भोजनाची व्यवस्था होती. पेयपानाची सोय मात्र त्यांच्या भक्तजनांकडून प्रायोजित करण्यात आली होती. जयललिता अम्मा यांच्या सेवेत आम्ही बजावलेली कामगिरी बहनजींपर्यंत पोहोचली. म्हणतात ना... कीर्तीचा सुगंध कस्तुरीसारखा दर्वळत असतो. खर्‍या दर्दींनाच तो कळतो आणि आम्हास बोलावणे धाडले जाते. (इथे महाराष्ट्रात सर्वांनाच सर्दी झालेली दिसते.) बहनजी आतापासूनच तयारीला लागल्या आहेत. पुढच्या निवडणुकीत कुणाशी युती करायची की एकट्यानेच लढायचे, हा त्यांचा पहिला अजेंडा आहे. त्यातच राहुलबाबांनी दिग्विजयसिंहांच्या प्रेरणेने जे दिवे पाजळले, त्यामुळे या प्रांती कॉंग्रेसचे बरेच हसे झाले आहे... पण आम्ही हे सारे आपणास का सांगतो आहोत? हा विषय बंद.

दिव्यांखाली उजेड... 
तर आपण कुठे आले होतो? (असे म्हटले की उगाचच ज्येष्ठ पत्रकार झाल्यासारखे वाटते, नाही?) औरंगाबाद देशी महान महान पत्रकारमहोदयांचे येणेजाणे वाढले आहे. एका कुमाराला सोबत म्हणून दुसराही कुमार औरंगाबादी संस्थेमध्ये जॉईन झाला. काय पण कमाल आहे बरे... आम्ही ऐसे ऐकून आहोत की वार्षिक 55 लाखांवरून 56 लाख अशी वाढ घेऊन ते आपल्या ‘मर्जी’ने जॉईन झाले म्हणे. एक लाखात काय येईल? असो. हा ज्याचा त्याचा प्रश्न. 
पण कुमारस्वामी मात्र ग्रेट आहेत. शुभारंभीच त्यांनी आपल्या वैश्विक लेखनातील वैश्विक संदर्भात जागतिक दर्जाच्या तीन चुका केल्या. (‘त्यांनी’ म्हणायचे कारण, की असे लेखन तेच करीत असावेत, असे आम्ही मानतो. भले ते कोणीही लिहो, त्याचे भलेबुरे मुख्य संपादकांच्याच खात्यावर जमा होणार ना!) पण ते अतिशय खुल्या दिलाचे आहेत. दुसर्‍या दिवशी अनेकांनी त्यांच्या ते लक्षात आणून दिले आणि तिसर्‍याच दिवशी त्यांनी सविस्तर खुलासा छापला. म्हणजे - फक्त ‘आम्ही दिलगीर आहोत’ अशी पट्टी नव्हे, तर त्या लेखात काय लिहायला हवे होते आणि काय छापून आले, हे त्यांनी सविस्तर सांगितले... मग, आमची भूमिकाच तशी आहे. वाचकांना सारे काही नीट समजून सांगायला हवे. मागचे-पुढचे-खालचे-वरचे-इकडचे-तिकडचे-सगळीकडचे त्यांना नीट समजले पाहिजे. असो, कार्यबाहुल्यात एवढ्या चुका होणारच. भले नाव मुख्य संपादकांचे असले, तरी ज्यांनी कोणी तो लिहिला, त्याने लिहिल्यानंतर स्वामींनी तो नीट तपासला नसावा. नाहीतर स्वामी अशी चूक करणार नाहीत. आमची खात्रीच आहे. बहुदा, औरंगाबादी त्यांना लेखनिक चांगले मिळत नसावेत.

सकाळी सकाळी अंधार...!
असो. मध्यंतरी या उलाढाली सुरू असताना एका भविष्यपत्राचे बारावे (सॉरी बारावा वर्धापनदिन) साजरा झाला. आता, याला ‘साजरा’ म्हणायचे की नाही हा प्रश्नच आहे. साजरा हा शब्द आमच्याकडे जनरली आनंदाच्या वेळी वापरतात. मराठवाड्यातही तशाच अर्थाने वापरत असावेत, असा आमचा समज आहे. तर, या वेळी भविष्यपत्राच्या वर्दापनदिनी साक्षात मोठ्‌ठ्ठया साहेबांना औरंगाबादी यावे लागले. 
एरव्ही, सध्या धाकटे साहेबच सारे काही सांभाळतात. खरे तर सध्या मोठ्या साहेबांंनी ऐच्छिक संन्यास घेतला आहे म्हणे. चिरंजिवांच्या हाती सुत्रे देऊन ते हरि हरि करण्याच्या मूडमध्ये होते. हा मूड औरंगाबादकरांनी खराब केला. रुपयात अंक विकूनही तब्बल 40 टक्के सर्क्युलेशन कमी झाल्यावर दुसरे काय होणार? बरे, नुकतेच पगारही वाढवून दिलेत. तरीही हा प्रकार? झाप झाप झापले म्हणे..! पण स्टाफ तरी काय करणार? एक रुपयात पेपर दिला तरी लोकांनी रुपया तरी का द्यावा? आणि पेपरात काय वाचावे? यांच्याच बातम्या, यांचीच प्रदर्शने, यांचेच चॅनल आणि यांचेच इव्हेंट. कमी अधिक झाले, तर यांना मदत न करणार्‍यांवर आगपाखड...! त्या बिचार्‍या विष्णू भागवतचे तर नशीबच फुटले. यांनी त्याचे साग्रसंगीत पुराण छापले. ते कमी पडले म्हणून की काय आता गावातल्या सगळ्या बसस्टॉपवर असलेल्या होर्डिंगवर ‘त्या’ बातमीचे कात्रण असलेला अंक मोठ्ठा करून झळकवताहेत... ‘आम्हीही सूड उगवू शकतो’ हे दाखवून देण्याची ही युक्ती लई भारी आहे... मोठ्‌ठ्या जाहिरातदारांनो सावधान. इथून पुढे इतर कोणाला जाहिराती - प्रायोजकत्व द्याल आणि आम्हाला नाही म्हणाल, तर बघून घेऊ... हां...!

कुमारस्वामींचा रविवार
दिव्याच्या प्रथम प्रकाशात न्हाऊन निघताना आम्हाला आश्चर्य एकाच गोष्टीचे वाटले, की कुमारस्वामींचा लेख रविवार पुरवणीच्या पहिल्या पानाऐवजी पाचव्या पानावर कसा? पहिले पान म्हणजे स्वामींचा अग्रहक्क. त्यावर कोणी अतिक्रमण करणे त्यांना बरे सहन होईल? पण ही सहनशक्ती त्यांच्यात आली... भोपाळसेठमुळे की कोणामुळे? कोणामुळे का असेना, रविवार पुरवणीचे पहिले पान ही तिकडे ‘रोखठोकी’ची मक्तेदारी आणि इकडे कुमारस्वामींची ‘परदेशवारी’. कुमारस्वामींच्या लेखनाचे एक वैशिष्ट्य आहे. ते कायम वैश्विक पातळीवर असते. मग उद्या त्यांनी औरंगाबादच्या गटारांचाही प्रश्न मांडायचे ठरविले, तरी त्यांना युरोपातील बर्मिंगहम परिसरातील गटारांचे वर्णन करावेसे वाटणार. असा वैश्विक दर्जाचा संपादक मराठीत निपजला, हे मराठी सारस्वताचे परमभाग्यच!

18 नारळ तयार...
आम्ही प्रारंभीच म्हटल्यानुसार दिव्याच्या प्रकाशात न्हाऊनही डोक्यात उजेड न पडलेल्या अनेकांचे नारळ देण्यासाठी पहिल्याच महिन्यात नंबर लागले असल्याचे आमच्या तीक्ष्ण कानांनी ऐकले आहे. कोणी पस्तीस हजारी मनसबदार आहे, कोणी तीस हजारी आहे, कोणी बावीस हजारी आहे, अशा खोटेनाटे दावे करून भल्या मोठ्या मनसबदार्‍या मिळविलेल्या पण हाती दारुगोळा अथवा फौजफाटा नसलेल्या मानाच्या गणपतींचा ‘बाप्पा मोरया’ होणार असल्याचे कळते. 
साहजिक आहे, भोपाळसेठनी काढलेला पेपर पत्रकारांचे पगार वाढविण्याच्या हेतूने नव्हे तर त्यांचा धंदा वाढविण्यासाठी काढला. काहीपण दावे करून आपल्या पर्सनॅलिटीच्या जोरावर मिळविलेली पदे आणि पगार प्रत्यक्ष कामात उतरल्यानंतर टिकविणे अवघड जाणार, हे भाकित आम्ही आधीच केले होते. पहिल्या महिन्यातच त्याची प्रचिती आली. चावडीवर उभे राहून लंब्याचौड्या बाता मारणे आणि प्रत्यक्षात काम दाखविणे यात जमीन आस्मानचे अंतर असते, हे सर्वांच्या लक्षात आले असेलच. ‘बाकी सारी खोगीरभरती’ या लेखांकात आम्ही वर्णन केल्याप्रमाणेच सारे काही घडते आहे. जे चांगले घडते आहे त्याचे आम्ही स्वागत करतो. या 18 जणांना त्यांच्या वकुबाप्रमाणे काम आणि पैसा मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

पण आता या मुळे दिव्याखाली या 18 जागांची व्हेकन्सी निर्माण होते आहे. ती भरण्यासाठी आता फक्त दुसर्‍या शेटजींचेच घर उरले आहे. तिथून माणसांची आवक आता चांगल्याच वेगाने सुरू झालेली दिसते. त्यामुळे शेटच्या कंपूतही घबराट पसरली असून तेथे नवीनवी माणसे घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत म्हणे. पुणेरी जहागिरीत आणखीही काही चांगली माणसे उरल्याचे आम्हाला कळते. त्यातील दोन-तीन जण लवकरच तीसहजारी मनसबदार म्हणून शेटजींचरणी रुजू होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

बाकी, लेट अस कीप इन टच...

1 जून 2011

पुन्हा एकदा नमस्कार...!

काही एका खास कारणासाठी आम्ही हा ब्लॉग सुरु केला. काहीतरी झकास वाचायला मिळावं असा आमचा प्रयत्न आहे. आजकाल पेपरच्या आठ स्तंभात काही शैलीदार वाचनीय सापडत नाही. ही उणीव भरून काढत असताना काही नर्मविनोदी टोले मारावेत असा आमचा प्रयत्न आहे.

हा बातम्या देणारा ब्लॉग नाही... बातमीमागील विश्लेषण आणि त्यातील गम्मत असा याचा प्रवास आहे. मागचे काही आम्ही दिवस विसावा घेतला. उत्तर प्रदेशात मायावती यांनी आम्हाला बोलावून घेतले होते. जयललिता यांच्यासाठी आम्ही दिलेली सेवा मायावती यांना आवडली. आता आम्ही अधून मधून यु पी मध्ये जाणार. त्यामुळे खंड पडत राहणार. दुराव्यानन्तरचा गोडवा अधिक असतो असे म्हणतात.

असे असले तरी आमचे लक्ष महाराष्ट्राकडे होतेच. पुण्यात उलाढाली चालू आहेत, औरंगाबाद मध्ये दिव्य मराठी सुरु झाला, औरंगाबाद सकाळ चा वर्धापन दिन साजरा होतो आहे, लोकमत मध्ये बरीच घालमेल चालू आहे... खूप काही ऐकू येत आहे. साहित्य वर्तुळात सुद्धा बरीच खलबते चालू आहेत. विश्व संमेलनाला कोणाकोणाला फुकटात न्यायचे यावर तिथे वाद चालू आहे म्हणे. बघू. आम्ही आढावा घेतो. मग बघू. लवकरच भेटू. 

19 मई 2011

ऋषि मुनींचे विष्णु पुराण आणि चक्रधरस्वामींचे लीळा चरित्र !

कोणे एके काळी पृथ्वीतलावर छापील मिडियाची ‘भाऊ’गर्दी झाली होती. ही भाऊगर्दी की ‘खाऊ’गर्दी या बद्दल सांप्रतातही संशोधन सुरू असोन या बाबत पक्की खबर मिळताच आपणांसमोर सादर केली जाईल. पण ते काळी खा खा खाण्याची स्पर्धा मिडियाच्या बाशिंद्यांमध्ये आणि त्यांच्या पोशिंद्यांमध्ये चालू होती म्हणे. कोणी ‘ब्लॅकमेल’ नामक काळी विद्या वापरून धन कमवायचा तर कोणी व्हाईट कॉलर पद्धतीने धमकावून अप्रसिद्ध समाजास प्रसिद्धीचे गाजर दाखवोन धनदौलतीचा स्वामी व्हायचा. यातच काळ जाऊ लागला आणि मालक प्रवर्गाच्या ऐसे लक्षात येवो लागले, की पेपर खपवून किती माल कमावणार? नव्या मशिनरी, न्यूजप्रिंट... ब्ला ब्ला ब्ला... त्यापेक्षा अधिकृतपणे नावांचा गैरवापर करणेस काय हरकत आहे? 

याचि मुहुर्तमेढ रोवली गेली साक्षात पुण्यनगरीत. ज्या नगरीच्या काळ्या मातीत साक्षात शिवछत्रपतींनी सोन्याचा फाळ लावून नांगर चालविला त्याच भूमीत मंडप मारून, स्टॉल उभारोन माल विक्रीस सुरवात झाली. जोडीला नंबर एकची विक्री असलेल्या आपल्याच घरच्या पेपरमुळे पब्लिसिटी काय सांगायची महाराजा? लाव स्टॉल की छाप बातमी. लाव स्टॉल की छाप बातमी. ऐसे करता करता अनेक वर्षे गेली. जन्तेसही पदरचे पैशे खर्चून पेपरवाल्यांच्या उपक्रमाची बातमी वाचणेची सवय लागली. मग पेपरवाल्यांची भूक वाढत गेली. धर बिल्डरला की लाव प्रदर्शन, धर शिक्षणसंस्थांना की लाव प्रदर्शन, धर कोणालाही आणि कर बाजारात उभा अशा प्रकारे पैशाची टाकसाळ उघडल्यानंतर औरंगाबादच्या शेटजींचे या कडे लक्ष न गेल्यास नवल. मग त्यांनीही आपला स्वतंत्र विभागच उघडला. काहीबाही कामे सुरू केली, पण हाताला यश मिळेना.

त्यातच चार वर्षांपुर्वी बारामतीकरांच्या आयपीएलची एकच धूम देशभरात सुरू झाली आणि चोर्‍यामार्‍यांचे पेटंट घेतलेल्या शेटजींच्या वारसदारांनी ही आयडियाची कल्पना उचलली आणि औरंगाबाद महानगरीत एपीएलनामक चेंडूफळीच्या भव्य दिव्य स्पर्धेचा घाट घातला. ग्राऊंड बुक झाले. टिमा निवडल्या. फ्रेंचाईजी मिळविले आणि चारदोन हजारांच्या गर्दीत म्याचा (मॅच) पार पडल्या. तदनंतर हाच खेळ पुण्यनगरीत लावणेचा निर्णय ऋषिमुनींनी घेतला. पण हे बघोन पुण्यनगरीतील मरहट्टे इरेस पडले. जाधवरावांनी आपले सारे प्यादे पणास लावोन रात्रीतून हलकल्लोळ केला आणि ऋषिमुनींना पुण्यानगरीतून काढता पाय घ्यावा लागला. मग पुण्यनगरीत यमपीयेल साजरी झाली. एपीएलच्या आधारदारांना यमपीयेलच्या सवंगड्यांनी साकडे घालणेचा प्रयत्न केला पण काय सांगायचे? पैसे काय झाडास लागतात? विष्णु भगवानांनी तयांस पुण्यनगरीत वित्तपुरवठ्यास विनम्र नकार दिला. ही झाली तीन सालपूर्वीची गोष्ट. पण सापाचा आणि पेपरवाल्याचा डुख काय विचारता महाराजा?

ऐन खाशा समयी औरंगाबादच्या विष्णु भगवानांनी पुणेकरांना (सुरेखा नव्हे) नाराज केले. पुणेकरांची नाराजी किती महागात पडेल, याची भागवत कथा विष्णुपंतांना कशी येणार? पण ही नाराजी भोवली आणि बिंग उघडकीस आलेनंतर भागवतकथेस जी काही जंबो पब्लिसिटी पुणेकरांनी दिली म्हणता महाराजा, की त्याचे नाव ते. एपीएलात येव्हढा मोठ्ठा पैसा खर्चूनही जेवढी जागा मिळाली नाही, ती पुणेकरांनी दिली! ती ही फुक्क्कट...!

इकडे ऋषिमुनींचे वर्तमान काय म्हणता? एरव्ही कोणाच्या कोणाच्या बातम्या मांडीखाली दाबायची त्यांची सवय, पण इथे सगळ्यांच्या मांड्या एकत्र आल्या तरी बातमी दबायचे नाव दिसेना. मग काय करता? नाईलाज म्हणून लावली बातमी. खरे तर ऋषिमुनींच्या आदेशानुसार देशमुखी गप्पा रंगवून विष्णुचा मकरंद शोषण्याचे कार्य कधी काळी पार पडले होते. हे विष्णुपुराण ऋषिमुनींनी मन लावून लिहिले. तयांचे लेखणीधर साक्षात चक्रधरस्वामींना त्यांनी पुराणातील वांगी तळण्याचे उभे आदेश (स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स) दिले होते. स्वामींनी हुजूर हुकमाची पूर्ण पूर्तता करीत लीळाचरित्रे रचिली. ऐसे चार वर्षे चालले. या काळात सारे काही सुरळीत सुरू होते. विष्णुपुराणाचा लाभ म्हणून अनेकांना टाटांचे विनाअश्व रथ देण्याचे मनोरथ रचले गेले. क्यांपेना चालविल्या गेल्या. मराठवाडी देशी नुस्ती धम्माल उडाली होती महाराजा... आणि साक्षात ऋषिमुनींचाच आदेश असलेने कॉलमातील काळ्या पांढर्‍याला सेंटीमीटरचे रेटच लागेनात. तिथे थेट मिटरात भाषा चालू लागली. पेपरवाला हाताशी धरला तर आपले काही वाकडे होत नाही, ऐशा धारणेतून धोरणी विष्णु भगवानांनी हा सारा घाट घातला खरा, पण ....

पण हाय रे दुर्दैवा... कुणा तरी नतद्रष्टाने काहीतरी केले आणि भागवत पुराणाचे मावंदे घालायची वेळ आली. पण आपल्याकडे कायद्याचे एक बरे आहे. करणारा अडकतो. पाठिंबा देणारा निमानिराळा राहतो. राहू देत. राहू देत. पुढच्या एपीएलला नवा फ्रेंचाईजी कसा मिळवायचा या बाबत नुकतीच एक बैठक झाल्याचे आम्हास कळले आहे. हा म्हणायचा व्यवहार. शो मस्ट गो ऑन. गेम शुड कन्टिन्यू. 

आता ऋषिमुनी एकात चार पेपर देणार आहेत. दिव्याचा प्रकाश तीन टप्प्यात पडणार हे कळले, की यांनी चार टप्प्यांची योजना सुरू केली. चौथा पेपर कधी सुरू होणार? दिव्याचा प्रकाश पडण्याच्या चार दिवस आधी...! याला म्हणतात व्यवहार...! असो.. ऋषिमुनींना भागवत पुराणातील मौलिक यक्ष प्रश्नांची उत्तरे देण्याची वेळ टळण्याच्या शुभेच्छा. नाही तर विकतचे वांधे व्हायचे....!