काही एका खास कारणासाठी आम्ही हा ब्लॉग सुरु केला. काहीतरी झकास वाचायला मिळावं असा आमचा प्रयत्न आहे. आजकाल पेपरच्या आठ स्तंभात काही शैलीदार वाचनीय सापडत नाही. ही उणीव भरून काढत असताना काही नर्मविनोदी टोले मारावेत असा आमचा प्रयत्न आहे.

असे असले तरी आमचे लक्ष महाराष्ट्राकडे होतेच. पुण्यात उलाढाली चालू आहेत, औरंगाबाद मध्ये दिव्य मराठी सुरु झाला, औरंगाबाद सकाळ चा वर्धापन दिन साजरा होतो आहे, लोकमत मध्ये बरीच घालमेल चालू आहे... खूप काही ऐकू येत आहे. साहित्य वर्तुळात सुद्धा बरीच खलबते चालू आहेत. विश्व संमेलनाला कोणाकोणाला फुकटात न्यायचे यावर तिथे वाद चालू आहे म्हणे. बघू. आम्ही आढावा घेतो. मग बघू. लवकरच भेटू.