1 जून 2011

पुन्हा एकदा नमस्कार...!

काही एका खास कारणासाठी आम्ही हा ब्लॉग सुरु केला. काहीतरी झकास वाचायला मिळावं असा आमचा प्रयत्न आहे. आजकाल पेपरच्या आठ स्तंभात काही शैलीदार वाचनीय सापडत नाही. ही उणीव भरून काढत असताना काही नर्मविनोदी टोले मारावेत असा आमचा प्रयत्न आहे.

हा बातम्या देणारा ब्लॉग नाही... बातमीमागील विश्लेषण आणि त्यातील गम्मत असा याचा प्रवास आहे. मागचे काही आम्ही दिवस विसावा घेतला. उत्तर प्रदेशात मायावती यांनी आम्हाला बोलावून घेतले होते. जयललिता यांच्यासाठी आम्ही दिलेली सेवा मायावती यांना आवडली. आता आम्ही अधून मधून यु पी मध्ये जाणार. त्यामुळे खंड पडत राहणार. दुराव्यानन्तरचा गोडवा अधिक असतो असे म्हणतात.

असे असले तरी आमचे लक्ष महाराष्ट्राकडे होतेच. पुण्यात उलाढाली चालू आहेत, औरंगाबाद मध्ये दिव्य मराठी सुरु झाला, औरंगाबाद सकाळ चा वर्धापन दिन साजरा होतो आहे, लोकमत मध्ये बरीच घालमेल चालू आहे... खूप काही ऐकू येत आहे. साहित्य वर्तुळात सुद्धा बरीच खलबते चालू आहेत. विश्व संमेलनाला कोणाकोणाला फुकटात न्यायचे यावर तिथे वाद चालू आहे म्हणे. बघू. आम्ही आढावा घेतो. मग बघू. लवकरच भेटू.