5 मई 2011

दास प्रेमाचा... धनी सोलापुरचा...!

आमचा सर्वत्र संचार असतो. कधि आम्ही औरंगाबादेत असतो तर कधी अकोल्यात तर कधी सोलापुरात. त्यामुळे स्वाभाविक सगळ्या बातम्या आम्हाला कळतात. आमच्या प्रेमदास राठोड यांच्याबद्दलच घ्या ना. सोलापूर लोकमतमध्ये काही दिवसापुर्वी औरंगाबादहून प्रेमदास राठोड यांना पाठवण्यात आले. त्यांचे अकोला कनेक्शन खतरनाक आहे. मध्यंतरी ते देशोन्नतीमधे होते. तेथील एका उपसंपादकाने आत्महत्या केल्याचे आपणास आठवत असेलच. त्या प्रकरणी प्रेमदास राठोड यांना बाहेर पडावे लागले. मग ते बाबुजींना शरण गेले. दोन वर्षांपूर्वी त्यांनी लोकमत जॉईन केले. या दोन वर्षांच्या काळात औरंगाबादेत ते फारसे काही दाखवू शकले नाहीत. त्यांचा स्वभाव सर्वांना सोबत नेण्याचा नाही. त्यामुळे ते एकटे पडले.
आता खरे युद्ध सुरु होताना मात्र मालकांनी त्यांना सोलापुरी का बरे पाठवले असावे? खरे तर ते सोलापुरात मागेच दाखल झाले. त्यांनी अंकातही बदल घडवून आणले. पण जिथे सोलापूर जिल्ह्यापुरताच अंक काढला जातो तिथे अशा ’महान’ माणसाला का पाठवले असावे? आता प्रेमदास राठोड यांच्याकडे निवासी संपादकपदाची अधिक्रुत जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पण त्यांच्या हातात किती सूत्रे राहणार? सोलापूरचे ’मालक, मुद्रक, प्रकाशक’ असणारे ग्रुहस्थ बाबुजींचे खास आहेत. ते यांना किती मोकळीक देणार?
आणि सर्वात महत्वाचा प्रश्न - औरंगाबादेत महायुद्ध पेटत असताना त्यांची रवानगी सोलापुरला का बरे करण्यात आली असावी? तुमचा काय अंदाज आहे? कळवाल?