9 मई 2011

'दिव्य' त्रिमुर्ती... बाकी सारी खोगीरभरती...!

आदर्णीय कुमारस्वामी आणि आदरणीय सुधीरशेठ यांनी आपली राजवस्त्रे परिधान केली आणि साक्षात देवगिरीच्या रणभूीवर फेरफटका मारला, तेव्हा शेठना परमसंतोष वाटला. जमवलेली फौज आपापल्या लॅपटॉपसमोर मग्न होती. कोणी पेनड्राईव्ह फॉरमॅट करीत होते तरीही त्यातील व्हायरस जात नव्हते. असे जालीम व्हायरस ‘गुपचुप गुपचुप साईटवरील असतात’, असे आमच्या सल्लागारांनी आम्हाला कळविले. तेव्हा आमच्या मनात कायपण कायपण येऊन गेले. (कार्यालयीन नेटचा वापर कोण कसा करतो, यावर आमचा प्रबंध सध्या तयार असून त्यावर आम्हास लवकरच डॉक्टरेट मिळणार आहे.)

असो. तर रणभूमीवर युद्धाला तोंड फुटण्याची वेळ आली, तरी तशी सामसुमच दिसत होती. पण शेट तशे तयारीचे. कोसळलेले टॉवर उभारण्याचे काम सुरू करून पेपर छापायला लवकर सुरवात करणेचे जिद्दीने ते पण मैदानात उतरून निरीक्षण करो लागले. तेव्हा असे लक्षात आले की जूनशिवाय छापणेच शक्य नाही. 
मग मात्र तयांना टेन्शन येवो लागले. जन्तेचे 1 करोड रुपय्ये त्यांचेकडे जमा आहेत. (50 हजार नोंदणी गुणिले 200 रुपय्ये, करा हिशेब) साला, धंदा करावा तर यांनीच... येवढ्या पैशाच्या व्याजावर छपाईच्या आधीचे सगळ्यांचे पगार निघून खर्चही वसूल होतो ना महाराजा...

तर कुमारस्वामी आणि शेटजी रणभूमीवर अवतरले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की समस्त सेनेत सध्या आनंदीआनंद आहे. लक्कीलॉटरी लागल्याच्या आनंदात प्रत्येकजण आहेत. पण हत्यारांकडे कुणाचे लक्ष नाही. कोणी सांगिलते होते, माझ्याकडे लंबी तलवार आहे, तर तिथे छोटा चाकू निघाला, कुणी म्हणाले माझ्याकडे वाघ मारण्याचा भाला आहे, तर तिथे इडली खायच्या काटा-चमच्यातील काटा निघाला, असेच सगळे वर्तमान होते. काही जणांकडे तर हत्यार म्हणून काय निघावे? दाढीच्या दुकानात वस्त्यार्‍याला लावायला अर्धी कापलेली आणि नंतर फेकून दिल्यामुळे गंजलेली ब्लेड असते ना... ती निघाली...! रेकॉर्ड पाहिले तर त्यात दांडपट्टा असे लिहिलेले होते! असे इथे कायपण कायपण चालले आहे.

मग स्वामी आणि शेटजी संतप्त झाले आणि युद्धाआधीच लढाईची वात पेटली. धाड धाड बाण बरसू लागले. सगळ्यांना पळता भुई थोडी झाली. आधीच ट्रेनिंगमधल्या कॅटागिरींचे टेन्शन आणि त्यात वर ही भर. पण काय सांगू महाराजा, कुमारस्वामी खिन्न झाले, शेटजी हतबल झाले... शेटजी कुमारस्वामींना म्हणाले, ‘काय हे? सोने विकून चिंध्या आणल्या?’ तर ते म्हणाले, ‘मी नाही आणल्या. मी फक्त पिशवी धरली. खरेदी तर दाढीवाल्यांनीच केली. पांढरी दाढी आणि काळीपांढरी दाढी...’ शेटजी भोपाळी स्वरात म्हणाले, ‘मी तुम्हाला मुकादम नेमले होते ना? मग सुपरवायझरवर सोडून तुम्ही मोकळे का झाला? आपल्याला वाचकांची मर्जी चालवायची की अतिशहाण्यांची? (सुपर-अति, वायझर-शहाणे!) 

मग कुमारस्वामी खिन्न झाले. मोठ्या उमेदीने त्यांनी जुना गड सोडला होता. नव्या गडाची उभारणी तर जोरात चालली होती, पण तटबंदीलाच भोके राहिली? खंदकात पाणी नाही. तोफा सज्ज नाहीत. उद्या पाऊस आला तर किल्लाच वाहून जाणार? मग आपण कुठले किल्लेदार, असा प्रश्न कुमारस्वामींना पडला. दाढीवाले तर आपापल्या मठीत सुरक्षित राहतील पण आपले घर उन्हात? मग कसे?

मग त्यांनी सैन्यदलाचा आढावा घेण्याचे ठरविले. एक एक करून सैनिक येऊ लागला आणि शस्त्र दाखवू लागला. काही शस्त्रे तर अशी निघाली, की चिमटीत धरून आणलेली होती... तीन शस्त्रे त्यातल्या त्यात बरी आहेत असा निष्कर्ष शेटजींनी काढले म्हणे. देशमुख, दंडवते आणि सराफ अशी ही शस्त्रेे धारण करणार्‍या तिघांची नावे निघाली. शेटजी म्हणाले, या तिघांनाच ठरलेला तनखा द्या. बाकीच्यांचा फेरविचार करा. 
आणि सदर उठली... भोपाळदिशेला निघोन गेली.

कुमारस्वामी रामदेवस्वामींच्या प्राणायमशिबिराकडे निघोन गेले. 
युद्धभूमी रणरणत्या उन्हात तापलेली होती. 
त्याचे चटके लांबपर्यंत जाणवत होते....