6 अप्रैल 2011

औरंगाबादी धम्माल...


सध्या औरंगाबादी एकच धम्माल चालू आहे. इलेक्शनच्या काळात जशे पैशे वाटतात तशे तिथे वाटणे चालले आहे म्हणे... रिपोर्टर ? घे 20 हजार. सबएडिटर ? - घे 25 हजार. चीफ रिपोर्टर - घे 30 हजार, चीफसबएडिटर? घे 35 हजार... निवासी संपादक ? घे 75 हजार... काही सांगू नका, नुस्ति चांदी आहे चांदी. भर अब्दुल्ला गुड थैली में...
पण म्हाराजा इकडे दोन माणसांच्या तोडाला फेस आला आहे - येपी आणि आरडी.. 
आमच्याकडे मनात दडून ऐकायचे मशीन आहे. ते मशीन त्यांच्या मनाला आणि आमच्या कानाला लावले की सग्ळे स्पष्ट ऐकू येऊ लागते. 
ते मशीन आम्हीच तयार केलेले आहे. सध्या एकच पीस आहे. तुम्हालाही हवे असेल तर थोडे थांबावे लागेल. नवीन मशीन बनवायला वेळ लागतो आणि वेटिंग खूप आहे. अशोक चव्हाण, विलासराव देशमुख, नारायण राणे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे (राजचे नाव आधी घेतले म्हणजे आम्ही मनसेवाले आहोत, असे नाही. अल्फाबेटिकली ‘यू’ आधी ‘आर’ येते) आणि असे 25 जण वेटिंगवर आहेत. खरे तर आम्हाला ‘बेटिंगवर’ म्हणायचे होते. पण व्यवहारात इतके स्पष्ट बोलायचे नसते.
असो.
तर ‘येपी’ आणि ‘आरडी’ यांच्या मनाला आणि आमच्या कानाला ते मशीन लावून आम्ही जे ऐकले ते खूपच मनोरंजक, धक्कादायक, चमत्कारिक... आणखी काय बरे... तर असे जे काही असेल तसे वाटले. काय बरे हे घडले? त्यांच्या मनात काय खळबळ माजली आहे? त्याचा वानोळा खास तुमच्यासाठी -


येपी ः जरा घाई करायला हवी होती राव...
काय करावे काही समजत नाही. या माणसानं जीव बेजार केलाय. काही काम करत नव्हता. नुस्ता बसून काड्या करायचा. कंपूशाही माजविली होती. म्हणून याला काढला. म्हटलं, आता जरा लायनीवर येईल पण कसचं काय? यानं तर औरंगाबादेत उच्छाद मांडला. माझी टीम फोडतोय म्हणे. सूड की काय म्हणे घ्यायचाय त्याला. बघू किती सूड घेतो ते... कधीतरी टाचेखाली येशीलच ना...
परवाच तिथं टीम पाठवली होती. म्हटलं माणसं रोखली पाहिजेत. पण कसचं काय? सगळ्यांनाच पगार वाढवून पाहिजेत. किती वाढवायचे? बरं तिथून इन्कम किती जनरेट होत? सगळी टार्गेट कागदावरच. प्रत्यक्षात कमाई किती? कुणी मराठवाड्यातून आलाय, कुणी तरुण भारतातून, कुणी आणखी कुठून... नुसतं पोसणं चाललंय. तो एक जण होता. ताईच्या काळपासून जाहिरातीचं बघायचा, त्याला चार दीडक्या वाढवून मिळाल्या तर गेला तिकडं. सोबत आणखी दोन तीन जणांना नेलं. कसंबसं एकाला रोखलं. पण याला काही अर्थ आहे? निष्ठा वगैरे काही आहेत की नाही? भले आम्ही निष्ठेचे लोणचे घालू पण यांनी असं सोडायला नको होतं. आमचा कल्याण चांगला. परत बोलावताच तो पळत आला. बरं पगारही थोडा कमीच घेतला. याला म्हणतात निष्ठा.
महाजनांना मी सांगितलं होतं, थोडाफार पगार वाढवूनही देऊ पण सध्या थांबवा. पण पोरं कुठली ऐकतात. आजकालच्या पोरांना धीरच नाही. आता अगदी खरं सांगायचं तर पगार वाढवून देऊ म्हणून मी आजपर्यंत खूप जणांना शेंड्याच लावल्या. ते तरी बिचारे किती दिवस थांबणार म्हणा? 
पण या बाहेरच्यांना इथं कडमडायचं काय कारण? आम्ही तिकडे जातो का? आम्ही इंग्रजी काढला पण इथंच वाटला. तिकडं फिरकलो तरी का? मग? त्यांनी इकडं का यावं? आमची पोरं फोडून नेताहेत. महेष देशमुख, श्रीकांत सराफ, दिलीप वाघमारे, रणजित खंदारे, महेष सरवदे, निरंजन छानवाल, प्रमोद चौधरी, प्रदीप भागवत, मधुकर कांबळे या सगळ्यांना त्यांनी पळवलं म्हणे. पळवू दे. पळवू दे. किती जण पळवतील? पण मला एक प्रश्न पडलाय, हे इतके पगार देऊच कसे शकतात? हिंदीतला पैसा मराठीत वळवणार? आम्ही एवढे दिवस पुण्याचा पैसा औरंगाबादेत वळवत आहोत तसे?
खरं तर या अगरवालांनी माझ्याशी एकदा बोलायला पाहिजे होते. आज माणसं घ्याल पण उद्या जाहिराती कशा मिळवाल? पेपर कसा काढाल? न्यूज प्रिंटचे भाव किती वाढताहेत...बघू. 
यूकेंना सांगितलंय, तिथं नाशकात लोकमतची माणसं फोडता आलं तर बघा. काय पगार वगैरे वाढवून देऊ. औरंगाबादेतही सांगून ठेवलंय. पेपर तर काढायलाच हवा. पगार मिळाला तरी तिकडं जायला बिचकणारी माणसं आमच्याकडे येतील असं वाटतंय तर खरं. पण आजकाल काही सांगता येत नाही. हाच चान्स घेऊन त्यांनी त्यांची माणसं पेरली तर पुन्हा वांधा. त्या अरुणचं कळायला आम्हाला दोन वर्षं लागली. जरा काळजी घ्यायला सांगायला पाहिजे.


आरडी ः मै परमजीतको बोला था
मै परमजीतको बोला था, मत कर. पर किया. अब भुगतो. पापा भी अडे रहे. ऍक्च्युअली चक्रधर अब सब संभाल लेंगा. सगळ्या लोकांना पगार वाढवून दिले. त्या सकाळवाल्यासारखे नुसते वाढवून देऊ म्हणून बोललो नाही. थेट वाढवले. हे येणार असे कळल्याबरोबर सगळीकडची माणसं फोडून काढली. चार आठ लोक इकडे तिकडे जाणारच म्हणून गरजेच्या दुप्पट माणसं भरून ठेवली. म्हटलं बघू कोण कोण जातं. कोणी गेले तरी मला फिकिर नाही. पण मानलं पाहिजे चक्रधरला. फुल्ल टाईट फिल्डिंग लावली. उनके हिसाबसे सबका पेमेंट बढाया. औकात नही थी फिरभी कई लोगोंको बडा किया. अब मुझे टेन्शन नही. पण साला संधू के जगहपे अब कोई अगरवालही चाहिये. हमारे पापाभी बहुत ग्रेट हैं. क्या क्या खेल खेले हैं उन्होंने. सब को सुला दिया था। अब मेरे हाथ पे ये पहलाही चॅलेंज है। कुछ करके दिखाना मंगता है. त्या नई दुनियाच्या अगरवालला बोलावला आहे संधूच्या जागी. हम मारवाडी हुये तो भी क्या हुवा, हम मे भी भेद है. औरंगाबादची अगरवाल कम्युनिटी डिव्हाईड झाली पाहिजे. म्हणून आमच्याकडे पण अगरवाल. देखते है क्या होगा.
पण साला त्यांना पण मानला पाहिजे. त्या सकाळची पूरी वाट लगा दी. आधे हमारे पास आधे उनके पास. चलो. अब खरी टसल हम मारवाडीयोंमेही होगी. कोई भी जीता तो मारवाडीही जितेंगा. 


अशा प्रकारचे मनोगत ऐकून आम्ही दंग झालो. 
तुम्हाला काय वाटते? 
काय होईल?